सांगलीत स्मृती मंधानाच्या लग्नाआधी अनपेक्षित घटना; वडिलांची तब्येत बिघडल्याने विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला

सांगली : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्यात एक अनपेक्षित विघ्न आले. लग्न समारंभाची थाटामाटात तयारी सुरू असताना स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.


सकाळी नाश्ता करताना श्रीनिवास मंधाना यांची तब्येत बिघडली. काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल असे सांगितले असले तरी, पूर्ण बरे होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याची शक्यता आहे.


दुपारी ३.३० वाजता स्मृती आणि पलाशच्या विवाहाचा मुहूर्त ठरलेला होता. परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. मात्र, स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच लग्नस्थळी सर्व तयारी थांबवण्यात आली. फार्म हाऊसची सजावट काढण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.


स्मृती मंधानाचा तिच्या वडिलांवर खूप जीव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत लग्नाचा कोणताही कार्यक्रम करू नये, असा निर्णय तिने घेतला आहे. कुटुंबीयांनीही हा निर्णय मान्य केला आहे. विवाह सोहळा पुढे कधी होणार याबाबत अद्याप तारीख निश्चित नाही.


?si=xdMRTsCZv3rXec6o

डॉक्टर काय म्हणाले ?


स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास यांना छातीत वेदना होऊ लागल्यामुळे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. वेळेवर उपचार सुरू झाल्यामुळे आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील काही तासांत त्यांच्या अनेक वैद्यकीय चाचण्या होणार आहेत. ही माहिती श्रीनिवास मंधाना यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर नमन शहा यांनी दिली. श्रीनिवास यांना हृदयविकार असल्याची लक्षणे आहेत, असे नमन शहा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

'महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दोन वर्षांत 'युएई' आणि सिंगापूरपेक्षा मोठी होणार'

देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्रच मुंबई : महाराष्ट्राचा जीडीपी २०१३ - १४ मध्ये १६ लाख कोटी

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढणार?

जमीन भूसंपादन प्रकरणात एसआयटी चौकशीचे महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश मुंबई : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा तिढा सुटणार

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव मळा आणि परिसरातील सुमारे ६ हजार ५७६ एकर जमिनीबाबत खंडकरी शेतकऱ्यांना न्याय