मुंबईच्या मतदारयादीत ११ लाख दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महानगरपालिकेने प्रकाशित केलेल्या प्रारूप मतदारयादीत तब्बल ११ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवणे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान आहे.


प्रारूप यादी तपासताना ११,०१,५०५ मतदार दुबार असल्याचे आढळले. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे एक लाख मतदारांची नावे तीन किंवा चार वेगवेगळ्या यादीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या पश्चिम उपनगरांची (४,९८,५९७) असून, पूर्व उपनगरात ३,२९,२१६ आणि मुंबई शहरात २,७३,६९२ दुबार नोंदी आढळल्या आहेत.


मतदारयादीवरील हरकती आणि सूचनांसाठी २७ नोव्हेंबर ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली आहे. तर ५ डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. मुंबईतील एकूण मतदारसंख्या १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ इतकी असून, त्यापैकी ११ लाखांहून अधिक नावे पुनरावृत्तीची असल्याने निवडणूक आयोग आणि महापालिका या दोघांवरही दुरुस्तीचे मोठे दडपण आले आहे.


महापालिकेने दुबार मतदारांची समस्या दूर करण्यासाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. प्रारूप मतदारयादीत जे मतदार दुबार नोंदले गेले आहेत, त्यांची नावे स्वतंत्रपणे चिन्हांकित करण्यात आली आहेत. अशा मतदारांना स्वतःहून आपले अतिरिक्त नाव वगळण्याची संधी दिली जाणार असून, अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मतदानाच्या दिवशी जर एखाद्या मतदाराची दुबार नोंदणी आढळली, तर त्या व्यक्तीकडून दुसरीकडे मतदान केले नसल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल. महापालिकेच्या या उपाययोजनांमुळे मतदारयादीतील चुका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

मी परकी नाही, उत्तर भारतीय मराठीच आहे’; मैथिली ठाकूरची मुंबईत प्रचारात एन्ट्री, मराठी गीताने वेधलं लक्ष

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. प्रचाराला १०० तासांपेक्षा कमी कालावधी

मतदान करा आणि हॉटेलमध्ये जावून कमी पैशात खा - मतदार जानजागृतीसाठी आहार संघटनेचा पुढाकार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये

निवडणुकीच्या कामांसाठी गैरहजर राहणाऱ्यांविरोधात सोमवारपासून पोलिस कारवाई

तब्बल ६,८७१ कर्मचारी,अधिकाऱ्यांना नोटीस सोमवारपासून साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या घरी पोलिसांचे समन्स मुंबई

दादरच्या संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाची दूरवस्था

सत्ता काळात दुर्लक्ष, निवडणूक जवळ येताच उबाठाला झाली आठवण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे

मेट्रो-९ मुळे अंधेरीतून थेट काशीगावपर्यंत प्रवास

दहिसर ते भाईंदर टप्प्यातील सुरक्षा तपासणीला सुरुवात मुंबई : दहिसर ते मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक

उबाठा आणि काँग्रेसला मुंबई महापालिका कळलीच नाही!

२५ वर्षं सत्ता आणि विरोधी पक्षांत राहून दिली कामांची फक्त आश्वासने मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी