हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रीजिजू हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या सदस्यांची बैठक घेणार आहेत. मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्राद्वारे बैठकीसाठी आमंत्रण दिले असून ही बैठक सोमवारी, ही सर्वपक्षीय बैठक, २४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता, नवी दिल्लीत संसद भवन ॲनेक्स या इमारतीच्या मुख्य समिती कक्षात होईल. संरक्षणमंत्री श्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.


संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर २०२४ रोजी सुरू होईल आणि सरकारी कामकाजाच्या अत्यावश्यक गरजांनुसार, अधिवेशन २० डिसेंबर २०२४ रोजी संपणार आहे. २६ डिसेंबर २०२४ रोजी असलेला संविधान दिन साजरा करण्याच्या निमित्ताने, लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही


तसंच केंद्र सरकार या अधिवेशनात सादर करण्यात येणाऱ्या विधेयकांची माहितीही विरोधकांना देणार आहे. याशिवाय हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी विरोधी पक्षांकडून सहकार्याचं आवाहनही केंद्र सरकार करणार आहे.या बैठकीत आगामी अधिवेशनात चर्चेसाठी येणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून दोन्ही सभागृहांचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावे यासाठी सरकार एकमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी संसदेत एक देश, एक निवडणूक यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.


हिवाळी अधिवेशनात कायदेविषयक कामे वेळेत पूर्ण व्हावीत, चर्चा अधिक परिणामकारक व्हावी आणि विरोधकांसोबत समन्वय साधून सत्र व्यवस्थित चालावे, यासाठी ही सर्वपक्षीय बैठक महत्त्वाची ठरणार आहे.


Comments
Add Comment

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे