भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी


पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा कठोर शब्दांत निषेध करत तिला अमानवीय आणि निंदनीय म्हटले आहे, तसेच दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे. या हवाई हल्ल्यात सुमारे ४०० जणांचा मृत्यू झाला तर २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.


भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटले, “या गुन्हेगारी कृत्याच्या दोषींना आंतरराष्ट्रीय समुदायाने जबाबदार धरले पाहिजे आणि अफगाणिस्तानमध्ये निरपराध नागरिकांना मनमानी पद्धतीने लक्ष्य करण्याचे प्रकार तात्काळ थांबवले पाहिजेत. भारत शोकाकुल कुटुंबीयांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो, जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो आणि या दुःखद प्रसंगी अफगाणिस्तानच्या जनतेसोबत एकजुटीने उभा आहे. तसेच, अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेबाबत आमचा ठाम पाठिंबा पुन्हा अधोरेखित करतो.”


परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले की, “रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या या निर्दयी हवाई हल्ल्याचा भारत तीव्र निषेध करतो. या भ्याड हल्ल्यात मोठ्या संख्येने निरपराध लोकांचा बळी गेला आहे. पाकिस्तान हा नरसंहार लष्करी कारवाईच्या नावाखाली लपवण्याचा प्रयत्न करत आहे.”“पाकिस्तानची ही आक्रमक कारवाई अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे तसेच प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याचे गंभीर उल्लंघन आहे. आपल्या अंतर्गत अपयशांपासून लक्ष विचलित करण्यासाठी सीमा ओलांडून हल्ले करणे ही पाकिस्तानची आणखी एक खालची पातळीची कृती आहे. हा हल्ला रमजानच्या पवित्र महिन्यात करण्यात आला, जो संपूर्ण मुस्लिम समुदायासाठी शांतता आणि करुणेचे प्रतीक आहे. कोणताही धर्म, श्रद्धा किंवा कायदा रुग्णालय आणि रुग्णांवरील हल्ल्याचे समर्थन करू शकत नाही.”


अफगाण तालिबान सरकारच्या प्रवक्त्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितले की, सोमवारी संध्याकाळी काबुलमधील एका व्यसनमुक्ती रुग्णालयावर झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे ४०० लोकांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान पाकिस्तानने या आरोपांना फेटाळून लावत म्हटले आहे की, हे हल्ले दहशतवादी तळ आणि दहशतवादी पायाभूत सुविधांवर करण्यात आले होते आणि सामान्य नागरिकांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नव्हते.

Comments
Add Comment

NEET UG Re-Test : २१ जूनच्या 'नीट' पुनर्परीक्षेसाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज; थेट हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सने १८ केंद्रांवर पोहोचणार प्रश्नपत्रिका!

नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशभरात घेण्यात येणाऱ्या 'नीट' (NEET UG २०२६) परीक्षेच्या मागील

Flight Incident : दिल्लीत आलेल्या वादळाचा एअर इंडियाच्या तीन विमानांना तडाखा

नवी दिल्ली : दिल्लीत इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमातळावर रविवारी संध्याकाळी ४:३० च्या दरम्यान अचानक जोरात वादळी

शेअर बाजारात 'ब्लॅक मंडे' : सेन्सेक्स ७१९ अंकांनी आपटला, निफ्टीचीही मोठी घसरण; गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान!

नवी दिल्ली : नव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांच्या पदरात मोठी निराशा टाकली

MMA ONE CHAMPIONSHIP : भाजी विकणारा ते 'द नॉर्थस्टार'; मिझोरामच्या मुलाने जगात गाजवले नाव!

Bangkok Thailand : स्वप्ने पाहण्यासाठी मोठी शहरे किंवा आलिशान सुविधांची गरज नसते, तर ती पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त

India Expands Nuclear Arsenal To 190 Warheads : भारताच्या अण्वस्त्र साठ्यात मोठी वाढ, आकडा १९० वर! चीनला लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर भारताचा भर; 'सिपरी'चा नवा अहवाल

नवी दिल्ली : स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (Stockholm International Peace Research Institute) च्या २०२६ च्या इअरबुक अहवालातून

UP Religious Conversion : ५ वर्षांपासून सुरू असलेला 'लव्ह ट्रॅप'! जिम ट्रेनर तरुणीच्या प्रेमात बिझनेसमनचा मुलगा अडकला; नाव-धर्म दोन्ही बदलले