पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शुभेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भवानीपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. परितोष दास यांना अलिद्वारपूर येथून तिकीट देण्यात आले आहे.





भारत निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगालसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. हा कार्यक्रम जाहीर करून एक दिवस पण झाला नाही तोच भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यावरून भाजपच्या पश्चिम बंगालसाठीच्या तयारीचा अंदाज येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

यंदा पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ४ मे २०२६ रोजी होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. मुख्य सचिव नंदिनी चक्रवर्ती गृह सचिव जगदीश मीणा, डीजीपी पियुष पांडे यांची तडकाफडकी बदली झाली आहे. निवडणूक आयोगाने सिद्धनाथ गुप्ता यांची राज्याचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती केली. अजय कुमार नंदा (आयपीएस-१९९६) यांची कोलकाता पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नटराजन रमेश बाबू (आयपीएस-१९९१) यांची सुधारात्मक सेवा विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. अजय मुकुंद रानडे (आयपीएस-१९९५) यांची माहितीचे अतिरिक्त महासंचालक आणि पोलिस प्रमुख (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक हिंसाचारमुक्त आणि शांततेत होईल असा विश्वास व्यक्त केला. यानंतर पुढील काही तासांतच मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक अर्थात डीजीपी आणि कोलकाता पोलीस आयुक्त यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित