भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे आणि इतर पक्षांमधून आऊटगोईंग सुरू आहे. भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत असंतोष वाढू लागला आहे.


शिवसेनेतला असंतोष टोकाला जाण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने भाजप विरोधात स्वबळाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.


निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारी करत असतानाच शिवसेना आणि भाजप यांच्यात तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेनेने भाजपला थेट युती तोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे.


निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. सध्या राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच महायुतीतली धुसफूस वाढली आहे. दुसरीकडे मविआतसुद्धा राजकीय मारामारी जोर धरू लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शिउबाठाला वगळून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी मनसेला मविआत घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.



बिहारमधील शपथविधीला फडणवीस आणि अजित पवार जाणार


बिहारमध्ये गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी नितीश कुमार सरकारचा शपथविधी सोहळा आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित असतील की नाही हे अद्याप समजलेले नाही. एनडीएतील इतर घटक पक्षांचे सर्वोच्च नेते तसेच एनडीएचे सर्व मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील.

Comments
Add Comment

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Beed News: दोन बहिणींनी अपहरणाचा कट लावला उधळून

बीड: महिला अत्याचाराच्या घटना राज्यात कुठे ना कुठे होत आहेत. त्यात बीडमध्ये दिवसा-ढवळ्या दोन तरुणींच्या

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी