भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना

मुंबई : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे आणि इतर पक्षांमधून आऊटगोईंग सुरू आहे. भाजपमधील वाढत्या इनकमिंगमुळे शिवसेनेत असंतोष वाढू लागला आहे.


शिवसेनेतला असंतोष टोकाला जाण्याची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने भाजप विरोधात स्वबळाची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे तातडीच्या दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडण्याची शक्यता आहे.


निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारी करत असतानाच शिवसेना आणि भाजप यांच्यात तणाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर शिवसेनेने भाजपला थेट युती तोडण्याचा अल्टिमेटम दिला आहे.


निवडणूक कार्यक्रमानुसार महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. सध्या राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच महायुतीतली धुसफूस वाढली आहे. दुसरीकडे मविआतसुद्धा राजकीय मारामारी जोर धरू लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत शिउबाठाला वगळून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही पक्षांनी मनसेला मविआत घेणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे.



बिहारमधील शपथविधीला फडणवीस आणि अजित पवार जाणार


बिहारमध्ये गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी नितीश कुमार सरकारचा शपथविधी सोहळा आहे. या सोहळ्याला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित असतील की नाही हे अद्याप समजलेले नाही. एनडीएतील इतर घटक पक्षांचे सर्वोच्च नेते तसेच एनडीएचे सर्व मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील.

Comments
Add Comment

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या