थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जाला मिळणार माफी!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान परिषदेत आश्वासन


मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीस देण्यात आलेली स्थगिती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आज विधानपरिषदेत जोरदार चर्चा झाली. आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बँकांची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.


बँकेची आर्थिक स्थिती आणि वसुलीत सुधारणा


अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने जळगाव आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कर्ज वसुलीस स्थगिती दिली होती. या निर्णयामुळे बँकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. मात्र, सरकारने केलेल्या आवाहनानंतर जळगाव जिल्हा बँकेच्या वसुलीत मोठी सुधारणा झाली आहे. सुरुवातीला केवळ ४ कोटींवर असलेली वसुली आता ६० कोटींपर्यंत पोहोचली असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत हा आकडा ५०० कोटींच्या पार जाईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेची घडी बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी (MSC) बँकेकडून ८०० कोटींचे अतिरिक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे, ज्यामुळे खरीप हंगामात कर्ज वाटपासाठी १२०० ते १३०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.


कर्ज पुनर्गठन आणि विशेष समितीची स्थापना


ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) केले आहे, त्यांना कर्जमाफीच्या कक्षेत कसे आणता येईल, हा कळीचा मुद्दा आमदार शशिकांत शिंदे आणि सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. यावर मंत्र्यांनी जाहीर केले की, पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. तसेच, ज्यांचे पुनर्गठन अद्याप झालेले नाही, त्यांनी बँकेकडे वैयक्तिक अर्ज करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


हरभरा उत्पादक आणि मत्स्य शेतीला दिलासा


आमदार प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले की, हरभरा पिकासाठी कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बँकांकडे पुरेसा निधी असून पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, मत्स्य शेतीला आता शेतीचा दर्जा देण्यात

Comments
Add Comment

Lashkar-e-Taiba : पाकिस्तानात दहशतवाद्यांचा एकामागोमाग एक खात्मा! लष्कर-ए-तैबाच्या टॉप कमांडरची गोळ्या झाडून हत्या

पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी निशाणा साधला आहे. शेख युसूफ आफ्रिदी (Sheikh Yousuf

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

IPL 2026 GT vs CSK : गुजरातकडून चेन्नईचा घरच्याच मैदानावर लाजिरवाणा पराभव!

आयपीएल २०२६ च्या ३७ व्या सामन्यात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गुजरातने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर,

अमेरिकेच्या येल विद्यापिठाचा विद्यार्थी करणार मुंबई बंदर, माथाडी कामगार, शहराचा विकासावर पीएचडी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील

Malad BMC School : मालाड पश्चिममधील अतिधोकादायक नेमाणी शाळेत शिकतात महापालिकेची मुले

- भाजप नगरसेविकेने शिक्षण समितीच्या बैठकीत शाळा बंद करण्याची केली मागणी - पर्यायी शाळा लिबर्टी गार्डन शाळेत सुरु

BMC News : महापालिकेच्या स्टॉल्सचा परवाना अविवाहित व्यक्तीच्या मृत्यूनंतर आई, वडिलांच्या नावे होणार

- भाऊ आणि बहिणीच्या नावे करण्यास प्रशासनाने दर्शवला ठाम नकार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेचे स्टॉल्स