थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या कर्जाला मिळणार माफी!

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान परिषदेत आश्वासन


मुंबई : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वसुलीस देण्यात आलेली स्थगिती आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आज विधानपरिषदेत जोरदार चर्चा झाली. आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बँकांची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.


बँकेची आर्थिक स्थिती आणि वसुलीत सुधारणा


अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने जळगाव आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कर्ज वसुलीस स्थगिती दिली होती. या निर्णयामुळे बँकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला होता. मात्र, सरकारने केलेल्या आवाहनानंतर जळगाव जिल्हा बँकेच्या वसुलीत मोठी सुधारणा झाली आहे. सुरुवातीला केवळ ४ कोटींवर असलेली वसुली आता ६० कोटींपर्यंत पोहोचली असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत हा आकडा ५०० कोटींच्या पार जाईल, असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेची घडी बसवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी (MSC) बँकेकडून ८०० कोटींचे अतिरिक्त कर्ज मंजूर करण्यात आले आहे, ज्यामुळे खरीप हंगामात कर्ज वाटपासाठी १२०० ते १३०० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.


कर्ज पुनर्गठन आणि विशेष समितीची स्थापना


ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे पुनर्गठन (Restructuring) केले आहे, त्यांना कर्जमाफीच्या कक्षेत कसे आणता येईल, हा कळीचा मुद्दा आमदार शशिकांत शिंदे आणि सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला. यावर मंत्र्यांनी जाहीर केले की, पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल. तसेच, ज्यांचे पुनर्गठन अद्याप झालेले नाही, त्यांनी बँकेकडे वैयक्तिक अर्ज करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


हरभरा उत्पादक आणि मत्स्य शेतीला दिलासा


आमदार प्रवीण दरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले की, हरभरा पिकासाठी कर्ज मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. बँकांकडे पुरेसा निधी असून पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, मत्स्य शेतीला आता शेतीचा दर्जा देण्यात

Comments
Add Comment

Amit Shah : एफसीआरए विधेयकावर अमित शाह बोलण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सलग गदारोळ आणि कामकाज थांबल्याचा तिढा सोडवण्यासाठी केंद्र सरकारने

Women's Reservation Bill : परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घेण्याची केंद्र सरकारची तयारी; किरेन रिजिजू आणि राहुल गांधी यांची भेट

नवी दिल्ली : परिसीमन (Delimitation Bill) आणि महिला आरक्षणाशी (Women's Reservation Bill) संबंधित महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकांवर केंद्र

Sheikh Hasina : 'बांगलादेशातील उठाव हे नियोजित सत्तांतर'

नवी दिल्ली : बांगलादेशात २०२४ मध्ये झालेल्या निदर्शनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत

Waqf Cases : वक्फ नोंदींच्या वादग्रस्त प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी विशेष बेंच

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा मुंबई : राज्यात

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम