उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत इराण-इस्रायल तणाव, देशांतर्गत परिस्थिती तसेच महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय झाला.


युद्धजन्य परिस्थितीत ‘एनडीए’चा घटक पक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधानांच्या भूमिकेसोबत ठामपणे उभी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “देश प्रथम” हीच भूमिका कायम ठेवत आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.


बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात खोटा प्रचार करून राजकारण करणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. काही नेते पाकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी वक्तव्य करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.


युद्धस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणल्याची माहिती शिंदे यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच होर्मुज सामुद्रधुनीतून भारताची तेलवाहतूक सुरक्षितपणे पार पडण्यासाठी केंद्राने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभार मानले.


राज्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. गॅस टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर त्यांनी विरोधकांना धारेवर धरत राज्यात कुठेही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार दक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.


दरम्यान, राज्यसभेत डॉ. ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीचेही त्यांनी स्वागत केले. शिवसेना खासदारांनी सभागृहात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


या भेटीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि रवींद्र वायकर उपस्थित होते.


तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि पियूष गोयल उपस्थित होते. संसदीय कार्यमंत्री रिजीजू यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या संसदीय कामकाजातील योगदानाची दखल घेतली.

Comments
Add Comment

FIFA FINAL | मुंबईतील फुटबॉल चाहत्यांचा निकाल! अर्जेंटिना की स्पेन? कोण उचलणार विश्वचषक?

मुंबई : एका ऐतिहासिक महामुकाबल्यासाठी संपूर्ण जग सज्ज झाले आहे. मेटलाइफ स्टेडियममध्ये होणारा फिफा विश्वचषक २०२६

Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत

Krishna Temple : श्रीकृष्ण चरणी भक्ताने अर्पण केली २० लाखांची सोन्याची बासरी

राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक

Cockroach Janata Party : जंतर-मंतरवर ‘हिंदू देवतांचा अवमान आणि ‘हेट स्पीच'; कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई(Mumbai): जंतर-मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली नीट परीक्षेच्या प्रश्नावर