उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; देशस्थिती, महाराष्ट्रातील प्रश्नांवर सखोल चर्चा

नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत इराण-इस्रायल तणाव, देशांतर्गत परिस्थिती तसेच महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय झाला.


युद्धजन्य परिस्थितीत ‘एनडीए’चा घटक पक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधानांच्या भूमिकेसोबत ठामपणे उभी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “देश प्रथम” हीच भूमिका कायम ठेवत आम्ही केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे त्यांनी सांगितले.


बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात खोटा प्रचार करून राजकारण करणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. काही नेते पाकिस्तानमध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी वक्तव्य करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.


युद्धस्थितीमुळे आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित परत आणल्याची माहिती शिंदे यांनी पंतप्रधानांना दिली. तसेच होर्मुज सामुद्रधुनीतून भारताची तेलवाहतूक सुरक्षितपणे पार पडण्यासाठी केंद्राने केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी आभार मानले.


राज्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. गॅस टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर त्यांनी विरोधकांना धारेवर धरत राज्यात कुठेही टंचाई नसल्याचे स्पष्ट केले. काळाबाजार रोखण्यासाठी सरकार दक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले.


दरम्यान, राज्यसभेत डॉ. ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीचेही त्यांनी स्वागत केले. शिवसेना खासदारांनी सभागृहात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देशही त्यांनी दिले.


या भेटीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे आणि रवींद्र वायकर उपस्थित होते.


तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू आणि पियूष गोयल उपस्थित होते. संसदीय कार्यमंत्री रिजीजू यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांच्या संसदीय कामकाजातील योगदानाची दखल घेतली.

Comments
Add Comment

Contaminated Water In Mantralaya : दूषित पाण्यामुळे मंत्रालयातील शंभरहून अधिक कर्मचारी आजारी

मुंबई : राज्याचे प्रशासन ज्या वास्तूतून चालते, त्या मंत्रालयातील पाण्याच्या मुख्य टाकीत चक्क मेलेले मांजर आढळून

Devendra Fadanvis : शिवरायांच्या नावावर निरर्थक वाद उकरून काढणे संतापजनक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; आक्षेप घेणाऱ्यांनी 'शिवाजी कोण होता?' पुस्तक वाचले का? मुंबई : "छत्रपती शिवाजी

Nashik : टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, पीडितेचं नाव बदललं अन्....

नाशिक : नाशिक शहरातील टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या

Crime : नॉनव्हेज जेवणाचा वाद विकोपाला, वैतागलेल्या पत्नीने धारदार शस्त्र घेऊन केलं थेट असं काही की...

तेलंगणा Telangana : तेलंगणातील कामारेड्डी परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छोट्याशा कौटुंबिक वादाचं रूपांतर

Pratap Sarnaik : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत नवा फॉर्म्युला

दंडात्मक कारवाईला तूर्तास ब्रेक; १ मेपासून राज्यव्यापी मोहीम, चालकांना सहा महिन्यांचा 'दिलासा' मुंबई : राज्यातील

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ