कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद


कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या तीन दिवसांत लागण्याची शक्यता वाढली आहे.


सामना शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू झाला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांत आटोपला. यानंतर भारताने नऊ बाद १८९ धावा केल्या. शुभमन गिल फलंदाजी करत असताना मानेचे स्नायू दुखावल्यामुळे निवृत्त झाला. भारताचा पहिला डाव १८९ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत संपुष्टात आला. निर्णायक डावासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला लवकर दोन धक्के बसले. फक्त एक धाव झाली असताना यशस्वी जयस्वाल आणि दुसरी धाव झाल्यानंतर केएल राहुल बाद झाला. आता नाईटवॉचमन वॉशिंग्टन सुंदर आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल खेळत आहेत. भारताने दोन बाद २१ धावा केल्या आहेत. कोलकाता कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आणखी १०३ धावांची आवश्यकता आहे.


कोलकाता कसोटीत आतापर्यंत ३१ फलंदाज बाद झाले आहे. एवढ्या कमी वेळात ३० पेक्षा जास्त फलंदाज बाद झाल्यामुळे सामना लवकर संपण्याची शक्यता वाढली आहे.


याआधी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सात बाद ९३ वरुन या धावसंख्येवरुन पुढे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. बुमराहने काँर्बिनला क्‍लीन बोल्‍ड केले. त्‍याने ३७ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकार फटकावत २५ धावा केल्‍या. काँर्बिनला क्‍लीन बोल्‍ड झाल्यानंतर थोड्याच वेळात टेम्बा बावुमाने चौकार मारत अर्धशतक केले. दक्षिण आफ्रिकेने १५० धावांचा टप्पा ओलांडला. यानंतर मोहम्मद सिराजने सात धावा करणाऱ्या हार्मरला क्‍लीन बोल्‍ड केले. नंतर सिराजने केशव महाराजला पायचीत केले. कर्णधार टेम्बा बावुमा नाबाद राहिला. त्याने १३६ चेंडूंचा सामना करत ५५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांत आटोपला. भारताला विजयासाठी शेवटच्या डावात १२४ धावा करण्याचे माफक आव्हान दक्षिण आफ्रिकेने दिले.


भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्को जॅन्सनने सलामीवीर यशस्वी जयस्वालला बाद केले. यशस्वी आपले खाते उघडू शकला नाही. जयस्वाल पाठोपाठ केएल राहुल यालाही मार्को जॅन्सनने बाद केले. भारताचे दोन्‍ही सलामीवीर तंबूत परतले आहेत. आता मैदानात असलेल्या सुंदर - जुरेल जोडीने टीम इंडियाचा डाव सावरला आहे.


Comments
Add Comment

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला