सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी


पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या पाच वर्षांत या परिसरात २५७ अपघात नोंदवले गेले असून, त्यापैकी ९५ अपघात गंभीर स्वरूपाचे होते. मागील पाच वर्षांत नवले पूल परिसरात ११५ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे. याच काळात ९४ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे नवले पूल परिसर मृत्यूचा सापळाच झाला असल्याचे गुरुवारी झालेल्या अपघातामुळे अधिकच अधोरेखित झाले आहे.


नवले पूल हा पुणे-बंगळूरु महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असून, सततची वर्दळ, वाहतूक कोंडी, एकमेकांना ओलांडून जाण्याची स्पर्धा आणि वेगाची हौस या परिसराला अपघातप्रवण क्षेत्र बनवत आहे. सर्वाधिक अपघात होणारे ब्लॅकस्पॉट म्हणून नवले पूल प्रसिद्ध आहे. या नवले पुलावरून वाहतूक करताना जीव मुठीत घेऊनच नागरिक प्रवास करतात, कारण कधी काय होईल अन् अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागेल याचा नेम नाही.


२०२१ मध्ये २१ अपघात झाले आणि २८ जणांचा मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये अपघातांची संख्या वाढून २५ झाली आणि मृत्यू २७ झाले. शहरात पाच वर्षांत म्हणजे २६० आठवड्यात ११५ जणांचा मृत्यू झाला म्हणजे दोन ते तीन दिवसांनंतर नवले पूल परिसरात एकाचा अपघातील मृत्यू होत असल्याचे भयावह वास्तव आहे.


२०२३ मध्ये सर्वाधिक मृत्यू


२०२३ वर्षात २२ अपघातांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वांत जास्त मृत्यू संख्या असलेले वर्ष ठरले. २०२४ मध्ये १८ अपघातांत २० जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबरपर्यंत ९ अपघात झाले असून, त्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.


नवले पूल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर


या सर्व घटनांमुळे नवले रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व वाहतूक तज्ज्ञांनी वारंवार केलेल्या सूचना असे असूनही येथे सुधारणा मंद गतीने होत असल्याची टीका केली जात आहे. पुलाजवळील उतार, अनियमित पार्किंग, चुकीच्या ओव्हरटेकिंग वेळी कमी दृश्यता आणि वेगमर्यादांचे पालन न होणे ही प्रमुख कारणे म्हणून सांगितले जात आहेत. वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार येथे सातत्याने गस्त वाढविण्यात आली आहे; परंतु नागरिकांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पुलाखाली व आसपासच्या भागात सिग्नल प्रणाली सुधारण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे वाढविण्याची, वेगमर्यादा दर्शक फलक अद्ययावत करण्याची आणि रस्त्याच्या डिझाइनमध्ये आवश्यक बदल करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह