Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो.


गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.





हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो, जो मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तर प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले. तसेच शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवून नवे युग सुरू केले. हा दिवस केवळ विजयाचे प्रतीक नसून चैतन्य आणि मांगल्याचा उत्सव आहे. घरोघरी उभारली जाणारी गुढी समृद्धीचे दर्शन घडवते. नव्या संकल्पांची सुरुवात करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित होते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस शुभ म्हणून नवीन कामाचा, कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो.



गुढीपाडवा का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्त्व? गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?


श्रीराम १४ वर्षे वनवास भोगून, रावणाचा वध करून, विजयी होऊन अयोध्या नगरीत आले, तो हाच वर्षप्रतिपदेचा दिवस होता.
ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली, तो चैत्र होता. म्हणून त्या महिन्याची सुरुवात गुढी उभारून केली जाते, असे म्हणतात. शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले होते, त्यात प्राण निर्माण करुन फौज तयार केली आणि शकाचा पराभव केला, या पराक्रमाची आठवण म्हणून शालिवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला शक सुरू केला, असेही म्हणतात.

Comments
Add Comment

Minor Girl Abuse Case : धक्कादायक! कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; पित्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा

कर्जत : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत सतत वाढ होताना दिसून येत आहे.

NEET Paper Leak : मॉडर्न कॉलेजकडून मोठी कारवाई! प्राध्यापिका मनीषा मांढरे अखेर निलंबित

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई

Nitesh Rane : राज्यातील आदिवासी भागात 'मत्स्यक्रांती'चे वारे; मंत्री नितेश राणे यांनी घेतला 'धरती आभा अभियाना'चा आढावा

- ५ वर्षांत १८० प्रकल्प मंजूर मुंबई : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी बहुल भागांमधील आर्थिक सक्षमीकरणाला गती

Devendra Fadnavis : राज्यातील तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी ९९३ कोटी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

- दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई : राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि

Nitesh Rane : बुरोंडीत मच्छीमार जेट्टी उभारणीला गती; दापोलीच्या मत्स्यव्यवसायाला मिळणार नवे बळ – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे प्रस्तावित मच्छीमार जेट्टी प्रकल्पाला आता गती

Nitesh Rane : इंधन बचतीसाठी मंत्री नितेश राणे यांचा मेट्रोने प्रवास

मुंबई : जागतिक इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला