Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड म्हणून साजरा केला जातो.


गुढी पाडव्याचे मंगल पर्व तसेच आगामी वर्ष सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो. युगादी, चेटी चाँद तसेच संसर पाडवो निमित्त देखील मी सर्वांना शुभेच्छा देतो, असे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.





हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो, जो मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, तर प्रभू श्रीराम वनवास संपवून अयोध्येत परतले. तसेच शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवून नवे युग सुरू केले. हा दिवस केवळ विजयाचे प्रतीक नसून चैतन्य आणि मांगल्याचा उत्सव आहे. घरोघरी उभारली जाणारी गुढी समृद्धीचे दर्शन घडवते. नव्या संकल्पांची सुरुवात करण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी गुढीपाडव्याचे महत्त्व अधोरेखित होते. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस शुभ म्हणून नवीन कामाचा, कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो.



गुढीपाडवा का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्त्व? गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?


श्रीराम १४ वर्षे वनवास भोगून, रावणाचा वध करून, विजयी होऊन अयोध्या नगरीत आले, तो हाच वर्षप्रतिपदेचा दिवस होता.
ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली, तो चैत्र होता. म्हणून त्या महिन्याची सुरुवात गुढी उभारून केली जाते, असे म्हणतात. शालिवाहनाने शकाचा पराभव करण्यासाठी मातीचे सहा हजार सैनिक तयार केले होते, त्यात प्राण निर्माण करुन फौज तयार केली आणि शकाचा पराभव केला, या पराक्रमाची आठवण म्हणून शालिवाहनाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला शक सुरू केला, असेही म्हणतात.

Comments
Add Comment

Ashok Kharat : भोंदू खरातच्या कार्यालयात मिळाल्या महिलांच्या नावाने चेक आणि अंगठीच्या रिंगा

सिन्नर मध्ये रूपाली चाकणकरांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक नाशिक :  भोंदू बाबा अशोक खरात याच्या कार्यालयाची

Heatstroke : लातूर - उष्माघातामुळे बळींची संख्या ४ वर

लातूर :  निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. स्वतःच्या शेतात काम करत असताना ७५

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ