अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे अमरावती, नागपूरमधील पेपर फुटीचे प्रकरण चर्चेत असतानाच सांगोल्यामध्ये प्रश्नपत्रिका चोरल्याची घटना घडली होती. सांगोला विद्यामंदिर येथील स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडून ५० प्रश्नपत्रिका पळवल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून विद्यार्थ्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली आहे.



विद्यार्थ्यानेच प्रश्नपत्रिका पळवली



याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगोला येथून दहावी बोर्डाची भूगोलाची प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली. यानंतर या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी सखोल चौकशी करत तपास केला. यामध्ये भूगोलाचा पेपर झाल्यानंतर एका इलेक्ट्रिक बाइकवरून आलेल्या दहावीत शिकणाऱ्याच मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यानंतर या मुलाने आपणच पेपर चोरला असल्याची कबुली दिली आहे.


महत्त्वाचे म्हणजे सगळे पेपर सोपे गेले भूगोलाचा अभ्यास झाला नाही. म्हणून चोरीची घटना घडली असल्याचा अनुमान सांगोल्यात लावला जात आहे. या चोरी प्रकरणात अल्पवयीन मुलाने वापरलेली इलेक्ट्रिक दुचाकी तसेच चोरलेली प्रश्नपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या धक्कादायक प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment

NEET : रविवारी नीट-यूजी फेरपरीक्षा, पेपरफुटी रोखण्यासाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

पुणे  : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाच्या (एनटीए) वतीने वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची नीट-यूजी फेरपरीक्षा रविवारी

Parbhani : परभणीत मंदिराचे छत कोसळून दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू

परभणी : येथील यशवाडी येथील हनुमान मंदिराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना घडली आहे.

Women Empowerment : महिला सक्षमीकरणासाठी महसूल विभागाचा पुढाकार

शासकीय पडीक जमिनी आता भाडेपट्ट्याने महिला बचत गटांना 'राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना' सुरू चारा आणि बांबू

Return of the Monsoon: सुस्तावलेला पाऊस पुन्हा सक्रीय, महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: गेल्या दोन आठवड्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली होती, ज्यामुळे पावसाची तूट

Parabharani : मंदिराचे सभामंडप कोसळले आणि होत्याचे नव्हते झाले... धक्कादायक घटनेचे इत्यंभूत वृत्त

परभरणी : मानवत तालुक्यातील यशवाडी परिसरात हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे छत

Agriculture Minister Dattatray Bharne : राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरणः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील ९०.८५