‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ उपसा


मुंबई : राज्यातील जलस्त्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०’ अभियानाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे आतापर्यंत राज्यातील ३ हजार २६८ जलसाठ्यांमधून ७.७३ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून, यामुळे तब्बल ७७ लाख पाण्याचे टँकर भरतील इतकी जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे ११ हजार ५८३ गावांतील सुमारे १ कोटी ३९ लाख नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे.


या योजनेचा सर्वाधिक लाभ राज्यातील शेतीला होत आहे. उपसा केलेला सुपीक गाळ सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेला आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांपैकी ९१ टक्के शेतकरी हे वंचित घटकांतील आहेत. सुपीक गाळामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत असून रासायनिक खतांवरील खर्चही कमी होत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.


२०२५-२६ या आर्थिक वर्षात या मोहिमेने विशेष गती घेतली आहे. चालू वर्षात १,३९८ जलसाठ्यांमधून २.६९ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला. भंडारा आणि जळगाव जिल्ह्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत कामात ३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ३२ लाख, तर जळगावमध्ये १६ लाख घनमीटर गाळ काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भच नव्हे, तर गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यांतही या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.



लोकसहभागातून जलक्रांती :


राज्यातील ४०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान यशस्वी ठरत आहे. राज्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने भूजल पातळी वाढवण्यासाठी हा उपक्रम कणा ठरत आहे. संभाव्य ‘एल-निनो’चे संकट आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शासन हा उपक्रम यापुढेही जोमाने राबविणार आहे, असे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले.



योजनेचा लेखाजोखा :


- एकूण जलसाठे : ३,२६८


- गाळ उपसा : ७.७३ कोटी घनमीटर


- लाभार्थी गावे : ११,५८३


- फायदा झालेले नागरिक : १.३९ कोटी


- संबंधित जिल्हे : ३४

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व