‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ उपसा


मुंबई : राज्यातील जलस्त्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०’ अभियानाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे आतापर्यंत राज्यातील ३ हजार २६८ जलसाठ्यांमधून ७.७३ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून, यामुळे तब्बल ७७ लाख पाण्याचे टँकर भरतील इतकी जलसाठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे ११ हजार ५८३ गावांतील सुमारे १ कोटी ३९ लाख नागरिकांना त्याचा लाभ झाला आहे.


या योजनेचा सर्वाधिक लाभ राज्यातील शेतीला होत आहे. उपसा केलेला सुपीक गाळ सुमारे ६९ हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नेला आहे. विशेष म्हणजे, लाभार्थ्यांपैकी ९१ टक्के शेतकरी हे वंचित घटकांतील आहेत. सुपीक गाळामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होत असून रासायनिक खतांवरील खर्चही कमी होत असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.


२०२५-२६ या आर्थिक वर्षात या मोहिमेने विशेष गती घेतली आहे. चालू वर्षात १,३९८ जलसाठ्यांमधून २.६९ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला. भंडारा आणि जळगाव जिल्ह्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत कामात ३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात ३२ लाख, तर जळगावमध्ये १६ लाख घनमीटर गाळ काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भच नव्हे, तर गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यांतही या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू आहे.



लोकसहभागातून जलक्रांती :


राज्यातील ४०० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हे अभियान यशस्वी ठरत आहे. राज्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने भूजल पातळी वाढवण्यासाठी हा उपक्रम कणा ठरत आहे. संभाव्य ‘एल-निनो’चे संकट आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, जलसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शासन हा उपक्रम यापुढेही जोमाने राबविणार आहे, असे जलसंधारण विभागाकडून सांगण्यात आले.



योजनेचा लेखाजोखा :


- एकूण जलसाठे : ३,२६८


- गाळ उपसा : ७.७३ कोटी घनमीटर


- लाभार्थी गावे : ११,५८३


- फायदा झालेले नागरिक : १.३९ कोटी


- संबंधित जिल्हे : ३४

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी