कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्स स्टेडियम येथे खेळवला जात आहे. हा सामना तीन दिवसांत संपण्याची शक्यता आहे.

कोलकाता येथे सुरू असलेला कसोटी सामना शुक्रवार १४ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. अवघ्या दोन दिवसांत २६ फलंदाज बाद झाले. यामुळे सामना रविवार १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच तिसऱ्या दिवशी संपण्याची शक्यता आहे.



नाणेफेक जिंकून कोलकाता कसोटीत फलंदाजीचा निर्णय दक्षिण आफ्रिकेने घेतला. त्यांचा पहिला डाव १५९ धावांत आटोपला. यानंतर मैदानावर आलेल्या भारताने नऊ बाद १८९ धावा केल्या. शुभमन गिल फलंदाजी करत असताना मानेचे स्नायू दुखावल्यामुळे निवृत्त झाला. भारताचा पहिला डाव १८९ धावांत आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची पुन्हा एकदा दाणादाण उडाली. फक्त ९३ धावांत दक्षिण आफ्रिकेचे सात फलंदाज बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने ६३ धावांची आघाडी घेतली असली तरी कर्णधार बावुमा वगळता त्यांच्याकडे उर्वरित तळाचे फलंदाज आहे. सध्याची स्थिती बघता कोलकाता कसोटी लवकर संपण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

टीम इंडिया 'यशस्वी', रो'Hit' चा विक्रम, विशाखापट्टणममध्ये भारताने साजरा केला मालिका विजय

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे झालेला निर्णायक एकदिवसीय सामना भारताने

भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८ व्या षटकात गुंडाळला, जिंकण्यासाठी हव्या २७१ धावा

विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विशाखापट्टणम येथे निर्णायक एकदिवसीय सामना सुरू आहे. हा सामना

आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना मिळणार केवळ १८ कोटीच!

लिलावापूर्वीच बीसीसीआयच्या नियमांचा अनेक खेळाडूंना फटका मुंबई  : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावाची सध्या तयारी

इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची विराटला ७ वर्षांनी संधी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ६ डिसेंबर

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण