देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही आधार आवश्यक समजले जाते, परंतु देशात सहा कोटी मृत झालेल्या व्यक्तींचे आधारकार्ड अजूनही सक्रिय आहेत. देशभरात आठ कोटींहून अधिक आधारकार्डधारकांचा मृत्यू होऊनही केवळ १.८३ कोटी आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत, तर उर्वरित सहा कोटी आधारकार्ड सक्रिय आहेत. यामुळे भविष्यात या आधारकार्डचा वापर करून बँकेची फसवणूक, बनावट खाती सरकारी योजनांचा लाभ घेण्याचा गैरप्रकार होऊ शकतो. यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाकडून १५.५ दशलक्ष मृत व्यक्तींचा डेटा मिळाला आहे. नोव्हेंबर २०२४ ते सप्टेंबर २०२५ दरम्यान यादीत अतिरिक्त ३.८ दशलक्ष व्यक्तींची भर पडली आहे. यापैकी १.१७ कोटी लोकांची ओळख पटल्याने त्यांचे आधारकार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला