पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान

कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य


पंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पांडुरंगाच्या नवीन सागवानी लाकडी रथनिर्मितीचे काम पूर्ण झाले असून नुकतेच या रथाचे पंढरपूरासाठी प्रस्थान झाले आहे. रथाच्या बांधकामात जय-विजय, हनुमान आणि गरुड यांच्या आकर्षक कोरीवकामाचा समावेश आहे. पर्यावरणपूरकता लक्षात घेऊन पूर्ण रथ लाकडाच्या साहाय्याने तयार करण्यात आला असून कोणतेही धातूचे खिळे वापरलेले नाहीत. रथातील सर्व जोडकाम लाकडी खिळ्यांनीच करण्यात आले असून हे खिळे देखील कारागिरांनी स्वतः बनवले आहेत. रथाचे नक्षीकाम हे पूर्णतः हाताने घडवले आहे. केळबाई इंडस्ट्री (कुडाळ) चे सिद्धेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि नेरूर येथील कुशल कारागीर विलास मेस्त्री, श्यामसुंदर मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे काम पूर्ण केले आहे. रथ निर्मितीकारांच्या मते, सागवानी लाकडामुळे हा रथ पुढील किमान शंभर वर्षे टिकणार. आपल्या भावना व्यक्त करताना सिद्धेश नाईक म्हणाले, “पंढरपूर देवस्थानाच्या या पवित्र कार्यात सहभागी होण्याचा मान आम्हा कोकणवासीयांना लाभला, हे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पांडुरंगाच्या कृपेनेच हे कार्य साकार झाले.” स्थानिक प्रशासन आणि भक्तजनांच्या उपस्थितीत आज या रथाचे उद्घाटन भक्तीभावाच्या वातावरणात पार पडले.

Comments
Add Comment

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टीईटी परीक्षेकरिता आधुनिक तंत्राचा वापर

मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी ब्रिटिश सरकारकडे करणे अपेक्षित होते का ?

सरसंघचालक मोहन भागवत यांचा काँग्रेसला सवाल मुंबई : "आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली; मग आम्ही ब्रिटिश सरकारकडे

शाळेची बस १०० फूट दरीत कोसळली; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. देवगोई