पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान

कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य


पंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे पांडुरंगाच्या नवीन सागवानी लाकडी रथनिर्मितीचे काम पूर्ण झाले असून नुकतेच या रथाचे पंढरपूरासाठी प्रस्थान झाले आहे. रथाच्या बांधकामात जय-विजय, हनुमान आणि गरुड यांच्या आकर्षक कोरीवकामाचा समावेश आहे. पर्यावरणपूरकता लक्षात घेऊन पूर्ण रथ लाकडाच्या साहाय्याने तयार करण्यात आला असून कोणतेही धातूचे खिळे वापरलेले नाहीत. रथातील सर्व जोडकाम लाकडी खिळ्यांनीच करण्यात आले असून हे खिळे देखील कारागिरांनी स्वतः बनवले आहेत. रथाचे नक्षीकाम हे पूर्णतः हाताने घडवले आहे. केळबाई इंडस्ट्री (कुडाळ) चे सिद्धेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ आणि नेरूर येथील कुशल कारागीर विलास मेस्त्री, श्यामसुंदर मेस्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे काम पूर्ण केले आहे. रथ निर्मितीकारांच्या मते, सागवानी लाकडामुळे हा रथ पुढील किमान शंभर वर्षे टिकणार. आपल्या भावना व्यक्त करताना सिद्धेश नाईक म्हणाले, “पंढरपूर देवस्थानाच्या या पवित्र कार्यात सहभागी होण्याचा मान आम्हा कोकणवासीयांना लाभला, हे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पांडुरंगाच्या कृपेनेच हे कार्य साकार झाले.” स्थानिक प्रशासन आणि भक्तजनांच्या उपस्थितीत आज या रथाचे उद्घाटन भक्तीभावाच्या वातावरणात पार पडले.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे