बीकेसीच्या धर्तीवर वडाळ्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र

एमएमआरडीए करणार १५० एकर जागेचा विकास

मुंबई  : वडाळ्यातील आपल्या मालकीच्या १५० एकर जागेचा विकास वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार येथील भूखंडांचा ई लिलाव करून येथे व्यावसायिक आणि काही प्रमाणात निवासी संकुले उभारण्यात येणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीला अखेर एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. वडाळ्यातील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली. हा भूखंडाचे क्षेत्रफळ १०८६० चौरस मीटर असून या भूखंडावरील अनुज्ञेय बांधकाम १,०८,६०० चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध होणार आहे. पात्र निविदाकाराला या भूखंडाचे ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे.

एमएमआरडीए वडाळा येथील भूखंड क्रमांक ४० चा ई लिलाव करण्यासाठी गुरुवारी निविदा प्रसिद्ध केली. १०८६० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ८० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिला जाणार असून या ई लिलावातून एमएमआरडीएला किमान १६२९ कोटी रुपये महसूल मिळण्याची शक्यता आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलरपर्यंत नेण्यासाठी केंद्र सरकारने चार महानगरांचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात एमएमआर क्षेत्राचा समावेश आहे.

१५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव :


निविदेनुसार या भूखंडाच्या ई लिलावासाठी १,५०,००० रुपये प्रति चौरस मीटर असे राखीव दर निश्चित करण्यात आले आहेत. या राखीव दरानुसार एमएमआरडीएला या भूखंडाच्या ई लिलावातून किमान १६२९ कोटी रुपये इतका महसूल मिळणार आहे. दरम्यान, एमएमआरडीएने २००८ मध्ये वडाळ्यातील दोन भूखंडांच्या ई लिलाव करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. मात्र आर्थिक मंदीमुळे या ई लिलावास प्रतिसाद न मिळाल्याने २०१० मध्ये याच भूखंडांसाठी पुन्हा ई निविदा काढल्या आणि त्यास प्रतिसाद मिळाला. लोढा समूहाने ४०५३ कोटी रुपयांत भूखंड खरेदी केले आणि त्यावर न्यू कफ परेड नावाने टाऊनशीप उभारली. आता १५ वर्षांनंतर वडाळ्यातील भूखंडाचा ई लिलाव करण्यात येणार आहे.

वडाळ्यातील भुखंड विक्रीमुळे एमएमआरडीए होणार मालामाल, ई-लिलावातून १६०० कोटींहून अधिकचा महसूल मिळणार,  भुखंड विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध , व्यावसायिक आणि निवासी संकुले उभारण्यात येणार
Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील