सीएसएमटीवर मोटरमन, कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन; मुंबईकरांचे हाल! ऐन गर्दीच्या वेळेत लोकल सेवा ठप्प

४ महिन्यांपूर्वीच्या अपघातावरून अभियंत्यांवर गुन्हा; रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवत व्यक्त केला संताप


मुंबई : मुंबईकरांसाठी आजची सायंकाळ प्रवासाच्या दृष्टीने मोठी त्रासाची ठरली आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात अचानक आंदोलन सुरू केल्याने लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले. त्यामुळे सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून कल्याणच्या दिशेने (डाऊन लाईन) एकही रेल्वे गाडी धावलेली नाही, परिणामी सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे.


ऐन संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन्स सीएसएमटी स्थानकातच उभ्या आहेत, ज्यामुळे फलाटांवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.



या अचानक आंदोलनामागे ४ महिन्यांपूर्वी झालेला एक अपघात कारणीभूत ठरला आहे. जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला होता. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले होते.


या गंभीर अपघातानंतर, तब्बल चार महिन्यांनी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Culpuble Homicide) दाखल केला आहे. निष्काळजीपणा आणि ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका या अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे. याच कारवाईचा निषेध म्हणून मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवून आंदोलन सुरू केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांवरील या गुन्हेगारी कारवाईमुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आणि संताप पसरला आहे.


Comments
Add Comment

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी