सीएसएमटीवर मोटरमन, कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन; मुंबईकरांचे हाल! ऐन गर्दीच्या वेळेत लोकल सेवा ठप्प

४ महिन्यांपूर्वीच्या अपघातावरून अभियंत्यांवर गुन्हा; रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवत व्यक्त केला संताप


मुंबई : मुंबईकरांसाठी आजची सायंकाळ प्रवासाच्या दृष्टीने मोठी त्रासाची ठरली आहे. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात अचानक आंदोलन सुरू केल्याने लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले. त्यामुळे सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून कल्याणच्या दिशेने (डाऊन लाईन) एकही रेल्वे गाडी धावलेली नाही, परिणामी सर्वच स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे.


ऐन संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हे आंदोलन सुरू झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल ट्रेन्स सीएसएमटी स्थानकातच उभ्या आहेत, ज्यामुळे फलाटांवर चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.



या अचानक आंदोलनामागे ४ महिन्यांपूर्वी झालेला एक अपघात कारणीभूत ठरला आहे. जून २०२५ मध्ये मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची एकमेकांना धडक बसून अपघात झाला होता. यात ४ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले होते.


या गंभीर अपघातानंतर, तब्बल चार महिन्यांनी लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे विभागातील दोन विभागीय अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Culpuble Homicide) दाखल केला आहे. निष्काळजीपणा आणि ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका या अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे. याच कारवाईचा निषेध म्हणून मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी काम थांबवून आंदोलन सुरू केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांवरील या गुन्हेगारी कारवाईमुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आणि संताप पसरला आहे.


Comments
Add Comment

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलने ४ जणांना चिरडले!

मस्जीद बंदर रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, रेल्वे कर्मचा-यांच्या आंदोलनाने घेतले बळी, दोष कुणाचा? मुंबई :

बीडीडीतील ८४६ रहिवाशांना आठवड्याभरात मिळणार घरे

पहिल्या टप्प्यातील पाच इमारती तयार मुंबई : बीडीडी चाळीतील रहिवाशांना गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळीतील

जे निर्माण करू शकत नाहीत, तेच तोडफोडीवर बोलणार; नमो केंद्रावरून राजकीय वादंग!

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय. प्रश्न हा आहे की, फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना

‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; मंत्रालयात निनादणार समूहगान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'सार्ध शताब्दी' महोत्सवास उद्या सुरुवात मुंबई : देशप्रेमाचे

न्यायालये केवळ इमारती नसून लोकशाही मूल्यांचे प्रतीक – सरन्यायाधीश भूषण गवई

वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालय संकुलाची पायाभरणी व कोनशीलेचे अनावरण मुंबई : न्यायालयीन इमारती या केवळ भव्य

कुलाबा कॉजवे परिसरातील ६७ अनधिकृत फेरीवाल्यांना हटवले, महानगरपालिकेच्या ए विभागाकडून कारवाई

मुंबई (खास प्रतिनिधी): कुलाबा कॉजवे परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी अन्यथा आंदोलन