मतदार यादी पुनरिक्षणविरोधात 'इंडिया'ची देशव्यापी आंदोलनाची योजना

नवी दिल्ली : 'इंडिया' आघाडीने निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.


या पुनरीक्षण प्रक्रियेचा दुसरा टप्पा आजपासून (४ नोव्हेंबर) सुरू झाला असून हा टप्पा ४ डिसेंबरपर्यंत चालेल, ज्यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, गोवा, केरळ, तामिळनाडू यांसारख्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. याआधी बिहारमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली असून, ७.४२ कोटी मतदारांसह अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर रोजी प्रकाशित झाली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीनंतर 'इंडिया' आघाडी या पुनरीक्षण प्रक्रियेवर देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची योजना आखत आहे. या मुद्द्यावर आघाडी पुन्हा एकदा सामूहिकरित्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे.



निवडणूक आयोगाकडून १२ राज्यांमध्ये मतदार यादी सुधारणेचा दुसरा टप्पा सुरू; ५१ कोटी मतदारांची होणार तपासणी


भारतीय निवडणूक आयोगाने आजपासून (४ नोव्हेंबर) १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार यादी सुधारणेच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. यामध्ये सुमारे ५१ कोटी मतदारांचा समावेश आहे.


ब्लॉक लेव्हल ऑफिसर मार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्याची ही प्रक्रिया ४ डिसेंबरपर्यंत चालेल. तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि पुडुचेरी यांसारख्या महत्त्वाच्या आगामी निवडणुकांपूर्वी अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह मतदार डेटाबेस सुनिश्चित करण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे.


तपासणीनंतर, निवडणूक आयोग ९ डिसेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करेल आणि ८ जानेवारी २०२६ पर्यंत मतदारांना त्यावर दावे आणि आक्षेप नोंदवण्याची संधी मिळेल. अंतिम मतदार यादी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाशित होणार आहे.


या टप्प्यात मतदारांना तपासणीदरम्यान कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे, तर आधार कार्ड केवळ पडताळणीसाठी सूचक कागदपत्र म्हणून स्वीकारले जाईल.

Comments
Add Comment

AI ​​Impact Summit मधील आंदोलन प्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्षाला अटक

नवी दिल्ली : मागील आठवड्यात झालेल्या एआय इम्पॅक्ट समिटमधील भारतीय युवा काँग्रेसच्या आंदोलन प्रकरणात दिल्ली

US Tariff on India : अमेरिकेच्या टॅरिफ बदलांच्या परिणामांवर भाष्य करणे खूप घाईचे ठरेल - अर्थमंत्री निर्मला सीतारमण

अमेरिकेने केलेल्या शुल्कातील (टॅरिफ) बदलांच्या परिणामांबाबत भाष्य करणे खूप घाईचे ठरेल, असे केंद्रीय अर्थ आणि

Gold Vs Venom : सापाचं विष सोन्यापेक्षा कित्येक पटीने महाग, जाणून घ्या

मुंबई: जगभरात सापांबाबत उत्सुकता, आकर्षण आणि भीतीची भावना कायमच पाहायला मिळते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार,

Trending: दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा

मुंबई: आजच्या काळात जिथे लग्नांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि बडेजाव केला जातो, तिथे २०२३ बॅचच्या दोन तरुण

Air Ambulance Crash : झारखंडमध्ये एअर अँब्युलन्सचा भीषण अपघात: ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

रांची: झारखंडची राजधानी रांची येथून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या एका खासगी चार्टर एअर अँब्युलन्सला भीषण

लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ल्याची भीती; ISI च बांगलादेशी कनेक्शन उघड

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक वारसा स्थळ लाल किल्ला पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याची