ओडिशात रुग्णालयाच्या ICU ला आग, एवढ्या रुग्णांचा मृत्यू

कटक : ओडिशातील कटकच्या सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आणि रुग्णालयाचे ११ कर्मचारी जखमी झाले. ही घटना रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागातील आयसीयूमध्ये पहाटे २:३० ते ३:०० च्या दरम्यान घडली. ज्या आयसीयूला आग लागती त्यात गंभीर स्थितीत असलेलेल्या रुग्णांवर उपचार सुरू होते.



आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. रुग्णालयातील अनेक रुग्णांना तसेच त्यांचा नातलगांना आणि रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. आग प्रकरणी चौकशी होणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एकूण २३ रुग्णांना इतर विभागात हलवण्यात आले होते, त्यापैकी सात जणांचा हलवताना मृत्यू झाला, तर तीन जणांचा नंतर मृत्यू झाला, असे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले. प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून आले आहे. पण तज्ज्ञांच्या सहकार्याने आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१