२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका


मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या तेरा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कफील अहमद मोहम्मद अयुब (६५) याला मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) जामीन मंजूर केला. या जीवघेण्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १२७ जण जखमी झाले होते.


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरआर भोसले यांच्या खंडपीठाने १ लाख रुपयांच्या जामिनावर अयुबला जामीन दिला आहे. या प्रकरणातील कोर्टाच्या संपूर्ण आदेशाची प्रत अद्याप जाहीर झालेली नाही. मूळचा बिहारचा असलेला अयुब फेब्रुवारी २०१२ पासून मुंबई सेंट्रल तुरुंगात सतत कोठडीत आहे.


२०११ मध्ये, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर काबुतरखाना या तीन ठिकाणी अवघ्या १० मिनिटांच्या अंतराने स्फोट झाले होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला होता.


अयुबचे वकील मुबीन सोळकर यांनी युक्तिवाद केला की, खटला अतिशय संथ गतीने चालत असताना त्यांचा पक्षकार एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात आहे. अभियोग पक्षाने ८०० साक्षीदारांची तपासणी करण्याचे सांगितले होते, पण आतापर्यंत केवळ १७० हून अधिक साक्षीदारांचीच साक्ष झाली आहे. अयुबने आपल्यावरील आरोपांना खोटे ठरवत आणि अटकेपूर्वी दिलेला कबुलीजबाब ऐच्छिक नव्हता, असा दावा करत जामिनाची मागणी केली होती.

Comments
Add Comment

Nashik Simhastha 2027 : कुंभ २०२७साठी एआयची मोठी तयारी; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट’ आराखडा, जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित

Harihareshwar येथे खगोल दर्शन महोत्सव

मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन, पर्यटन

Eknath Shinde : 'गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करा'

मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द जलाशयातील जलपर्यटन टप्पा एक चे काम त्वरीत पूर्ण करून टप्पा दोन बाबतचा

Governor of Maharashtra : राज्यातील सर्व कृषी विद्यापीठात ५० ॲग्री-बेस्ड इनक्यूबेशन सेंटर्स स्थापन करा, राज्यपालांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्व कृषि विद्यापीठात कृषी उत्पादन विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्या टप्प्यात ५०

AI च्या मदतीने दूध भेसळ रोखण्यासाठी IIT ची मदत घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

मुंबई : राज्यात दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रीप तयार केली

hydroelectric project : उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्थेबरोबर ५ हजार २०० कोटींचा करार

मुंबई : जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात मुख्यमंत्री