२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका


मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी गेल्या तेरा वर्षांपासून तुरुंगात असलेल्या कफील अहमद मोहम्मद अयुब (६५) याला मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) जामीन मंजूर केला. या जीवघेण्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला होता आणि १२७ जण जखमी झाले होते.


न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आरआर भोसले यांच्या खंडपीठाने १ लाख रुपयांच्या जामिनावर अयुबला जामीन दिला आहे. या प्रकरणातील कोर्टाच्या संपूर्ण आदेशाची प्रत अद्याप जाहीर झालेली नाही. मूळचा बिहारचा असलेला अयुब फेब्रुवारी २०१२ पासून मुंबई सेंट्रल तुरुंगात सतत कोठडीत आहे.


२०११ मध्ये, झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर काबुतरखाना या तीन ठिकाणी अवघ्या १० मिनिटांच्या अंतराने स्फोट झाले होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने हे हल्ले घडवून आणल्याचा आरोप केला होता.


अयुबचे वकील मुबीन सोळकर यांनी युक्तिवाद केला की, खटला अतिशय संथ गतीने चालत असताना त्यांचा पक्षकार एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात आहे. अभियोग पक्षाने ८०० साक्षीदारांची तपासणी करण्याचे सांगितले होते, पण आतापर्यंत केवळ १७० हून अधिक साक्षीदारांचीच साक्ष झाली आहे. अयुबने आपल्यावरील आरोपांना खोटे ठरवत आणि अटकेपूर्वी दिलेला कबुलीजबाब ऐच्छिक नव्हता, असा दावा करत जामिनाची मागणी केली होती.

Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती