धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली. यामुळे गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे, अशी चर्चा सुरु होती. यामुळे गावात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच याबाबतीत स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. दरम्यान १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना घडल्याने गावकऱ्यांचा वन विभागावर रोष वाढला. त्यांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली.




संतप्त नागरिकांनी बेल्हे-जेजुरी महामार्गावर रास्ता रोको देखील केला. तसेच मुलाचा मृतदेह सोबत घेऊन नातेवाईकांसह गावकऱ्यांनी आंदोलन केले. वन विभागाच्या कार्यालयासह गाडीदेखील पेटवण्यात आली. या जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरखेड परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला आहे.

Comments
Add Comment

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे