धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली. यामुळे गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे, अशी चर्चा सुरु होती. यामुळे गावात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच याबाबतीत स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. दरम्यान १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना घडल्याने गावकऱ्यांचा वन विभागावर रोष वाढला. त्यांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली.




संतप्त नागरिकांनी बेल्हे-जेजुरी महामार्गावर रास्ता रोको देखील केला. तसेच मुलाचा मृतदेह सोबत घेऊन नातेवाईकांसह गावकऱ्यांनी आंदोलन केले. वन विभागाच्या कार्यालयासह गाडीदेखील पेटवण्यात आली. या जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरखेड परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला आहे.

Comments
Add Comment

असीम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवले

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचा कठोर निर्णय; २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला मुंबई : न्यायव्यवस्थेबद्दल

Satyajeet Tambe : सत्यजित तांबे अखेर भाजपच्या उंबरठ्यावर? मामा बाळासाहेब थोरातांनीच दिले 'ग्रीन सिग्नल'; म्हणाले, 'तो सज्ञान...

अहिल्यानगर : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे भाचे आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष

अलिबागच्या समुद्रात बेपत्ता झालेल्या मुंबईतील दोन तरुणाचा शोध सुरू

अलिबाग  : अलिबाग शहराजवळील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार ?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुतोवाच नागपूर : येत्या ८ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे

आंदोलने-मोर्चे काढून सत्ता मिळत नाही; जनता महायुतीसोबत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांना चपराक पंढरपूर :“आम्ही काम केले आहे, जनता पाहते आहे. आंदोलने-मो o-.र्चे

साखरेचा गाळप हंगाम सुरू, पहिल्याच दिवशी २८ कारखान्यांना परवाने

पुणे (प्रतिनिधी): राज्यातील साखर गाळप हंगाम शनिवारपासून सुरु झाला. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप