धक्कादायक! शिरुरमध्ये बालकावर बिबट्याचा हल्ला, संतप्त ग्रामस्थांनी पेटवले वनविभागाचे कार्यालय

पुणे: शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये १३ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली. यामुळे गावामध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर आहे, अशी चर्चा सुरु होती. यामुळे गावात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच याबाबतीत स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाला माहिती दिली होती. मात्र वन विभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. दरम्यान १३ वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना घडल्याने गावकऱ्यांचा वन विभागावर रोष वाढला. त्यांनी वन विभागाच्या कार्यालयाला आग लावली.




संतप्त नागरिकांनी बेल्हे-जेजुरी महामार्गावर रास्ता रोको देखील केला. तसेच मुलाचा मृतदेह सोबत घेऊन नातेवाईकांसह गावकऱ्यांनी आंदोलन केले. वन विभागाच्या कार्यालयासह गाडीदेखील पेटवण्यात आली. या जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर पिंपरखेड परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात झाला आहे.

Comments
Add Comment

इंटरलॉकिंग कामासाठी मध्यरेल्वेच्या 'या' स्थानकांदरम्यान विशेष ब्लॉक! जाणून घ्या सविस्तर वेळापत्रक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोणावळा - बीव्हीटी यार्ड, तसेच कल्याण – लोणावळा विभागातील अप यार्डमध्ये

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding.... एकाच दिवशी दोन धक्के…स्मृतीच्या वडिलानंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली

सांगली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा सांगलीत २३

पुण्यातील सायकल स्पर्धेनिमित्त सिंहगड किल्ल्यावर जाणारी वाहतूक पुढील ३ दिवस बंद, पर्यटकांना पायी मार्ग वापरण्याचा पर्याय

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ला नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिला आहे. मात्र आजपासून पुढील ३ दिवस सिंहगड

‘युनेस्को’च्या वर्ल्ड बुक कॅपिटल या दर्जासाठी पुण्याची दावेदारी

पुणे : ‘युनेस्को’च्या ‘जागतिक पुस्तक राजधानी’ (वर्ल्ड बुक कॅपिटल) या दर्जासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात! ट्रक चालकाचा ताबा सुटला अन् बॅरियर ओलांडत थेट चारचाकीवर उलटला

मुंबई: पुणे–मुंबई द्रुतगती महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील

ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचे होणार पर्यावरणीय पुनरुज्जीवन

मुंबई : विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री