भारताच्या मुलींची कमाल, वर्ल्डकप जिंकून केली धमाल; फक्त १० मुद्यात वाचा टीम इंडियाच्या विजयाची गोष्ट


नवी मुंबई :




  1. भारताच्या महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ (ICC Women World Cup 2025) जिंकला

  2. भारताने नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात (Final Match) दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि महिला विश्वचषक २०२५ नाव कोरले.

  3. अंतिम सामन्यात (Final Match) नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या पराभवाचे एक कारण ठरला.

  4. भारताने महिला विश्वचषक २०२५चा अंतिम सामना (ICC Women World Cup 2025, Final Match) ५२ धावांनी जिंकला. या सामन्यात ५० षटकांत २९९ धावा करण्याचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर होते. पण धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत आटोपला. याआधी प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत सात बाद २९८ धावा केल्या.

  5. भारताकडून शफाली वर्माने अंतिम सामन्यात सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली. तिनं ७८ चेंडूत दोन षटकार आणि सात चौकार मारत ८७ धावा केल्या. ही कामगिरी करणारी शफाली सामनावीर झाली.

  6. भारताच्या दीप्ती शर्माने अंतिम सामन्यात सर्वाधिक पाच बळी घेतले. फक्त ९.३ षटकांत ३९ धावा देत तिनं दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ बाद केला. दीप्तीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत नऊ सामन्यांत सर्वाधिक २२ बळी घेतले. ही कामगिरी करणारी दीप्ती मालिकावीर झाली.

  7. BCCIने महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले

  8. महिला विश्वचषक २०२५च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना ४२व्या षटकांत सामना भारताच्या दिशेने एकदम झुकला. या षटकांत दीप्ती शर्माने पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची कर्णधार असलेल्या लॉराला बाद केले. दीप्तीने टाकलेल्या चेंडूचा लॉराला व्यवस्थित अंदाज घेणे जमले नाही. फटका मारण्याच्या नादात झेल उडाला आणि अमज्योतने चेंडू व्यवस्थित झेलला. हीच ती महत्त्वाची विकेट होती, कारण लॉराने ९८ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या. लॉरा बाद झाली आणि दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी फळीच गारद झाली. यानंतर तळाच्या फलंदाजांना भारताने अवघ्या २६ धावांत तंबूत धाडले. लॉरा बाद झाली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती ४१.१ षटकांत सात बाद २२० अशी होती आणि सामना संपला त्यावेळी ४५.३ षटकांत २४६ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे सर्व फलंदाज बाद झाले होते.

  9. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.

  10. महिला वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचे शिल्पकार प्रशिक्षक अमोल मुझुमदार


Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)