दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार


अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ केल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कवाढीचा परत एकदा फटका बसणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही सलग चौथ्यावर्षी शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे शुल्कवाढीमुळे पालकवर्गात नाराजीचा सूर आहे.


मागीलवर्षी शिक्षण मंडळाने शुल्कवाढ केली होती. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. मार्च २०२५ मध्येच १२ टक्क्यांनी शुल्कवाढ केली होती. आता पुन्हा मार्च २०२६ साठी वाढ लागू केली आहे. एवढेच नव्हेतर प्रमाणपत्रे, गुणपत्रक लॅमिनेशन व इतर बाबींसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार असल्याने पालकांच्या खिशावर आर्थिक ताण येणार आहे. शिक्षण मंडळाने प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व परीक्षा संचालनाशी संबंधित खर्च वाढल्याचे कारण दिलेले असले, तरी प्रत्यक्ष हा भार पालकांनाच पेलावा लागणार आहे. दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी आधी ४७० रुपये असलेले शुल्क आता थेट ५२० रुपयांवर नेण्यात आले आहे, तर इयत्ता बारावी परीक्षेचे शुल्क ४९० वरून ५४० रुपये करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध