गजा मारणे टोळीला धक्का, रुपेश मारणेला अटक

पुणे : गुंड गजानन उर्फ गज्या मारणेच्या टोळीतील रुपेश मारणेला पोलिसांनी अटक केली आहे. मारणे टोळीचा म्होरक्या गजानन मारणे याच्या पाठोपाठ पोलिसांनी रुपेश मारणेलाही अटक केली आहे. दोन प्रमुख गुंड गजाआड झाल्यामुळे मारणे टोळीच्या कारवाया थंडावण्याची शक्यता वाढली आहे.


पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळी आणि घायवळ टोळी विरोधात कारवाई केली. आता मारणे टोळी विरोधातही पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. शिवजयंतीच्या दिवशी अभियंता देवेंद्र जोग यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दीर्घकाळ फरार असलेला रुपेश मारणेला मुळशी येथून २७ ऑक्टोबर रोजी कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेतले.




फेब्रुवारी महिन्यात कोथरुड परिसरात झालेल्या घटनेत देवेंद्र जोग या संगणक अभियंत्यावर काही गुंडांनी हल्ला केला होता. जोग हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले होते. तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणातील इतर मारेकरी आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र, प्रमुख आरोपी रुपेश या घटनेनंतर पसार झाला होता. अखेर मुळशीमध्ये सापळा रचून त्याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

Comments
Add Comment

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी १ मार्चपासून राज्यभर धडक मोहीम - परिवहन मंत्र्यांचे आदेश

- नियमोल्लंघन करणाऱ्या वाहनांवर होणार जप्तीची कारवाई मुंबई : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा

अजित पवार विमान अपघात प्रकरणी 'तो' अहवाल आज येणार! तांत्रिक बिघाड की मोठा घातपात ?

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. या अत्यंत

कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर

Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर