Artificial Flowers : कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्टता आणणार


मुंबई : राज्यातील लग्नसोहळे आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये वाढणारा कृत्रिम फुलांचा वापर पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने, अशा साहित्याचा वापर करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढून कारवाईबाबत स्पष्टता आणली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) विधानसभेत केली., कृत्रिम फुलांचा वापर करणाऱ्या डेकोरेटर्सवरही कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे त्यांनी सांगितले.


भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनीही उपप्रश्नांद्वारे या समस्येचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कृत्रिम फुले आणि प्लास्टिक सजावटीच्या या साहित्यातील रसायनांमुळे डोकेदुखी, त्वचाविकार, डोळ्यांची जळजळ आणि लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास उद्भवतात. दीर्घकालीन संपर्कामुळे कर्करोगाचा धोकाही संशोधनातून समोर आला आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.


ही फुले नद्या किंवा जलस्रोतांत विसर्जित केल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. तसेच, ही फुले पाळीव प्राण्यांच्या पोटात गेल्याने त्यांच्या पचनसंस्थेवरही गंभीर परिणाम होतात. कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापरामुळे नैसर्गिक फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचत आहे, असेही त्यांनी सांगितले.



डेकोरेटर्सवरही होणार कारवाई :


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "अनेकदा कृत्रिम फुलांचे साहित्य जलस्रोतांत टाकले जाते, जे अत्यंत घातक आहे. शासन निर्णय काढून कारवाईबाबत स्पष्ट तरतुदी केल्या जातील. जर लग्न समारंभात सजावटीसाठी कृत्रिम फुलांचा वापर झाला, तर संबंधित डेकोरेटरवरही कठोर कारवाई केली जाईल. आपण सनातन परंपरा मानणारे आहोत, त्यामुळे धार्मिक कार्यात फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशा वेळी मुंबई पालिकेने नैसर्गिक फुलांची बाजारपेठ बंद केली असेल, ते ती सुरू करण्याबाबत आजच आदेश दिले जातील", असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Dating App Fraud : अ‍ॅपच्या नादात महिला फसली प्रेमाच्या जाळ्यात

नवी दिल्ली : मैत्री, नातेसंबंध आणि प्रेम याला अनेकांच्या आयुष्यात प्रचंड महत्त्व असते. काहींना ते सहज मिळते तर

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Kane Williamson Retirement : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 16 वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीला पूर्णविराम

मुंबई : जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक केन विल्यमसनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी आताच तयारीला लागा ! कोकण रेल्वेचे कधी सुरू होणार आरक्षण ?

मुंबई : यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची

Sejal Pawar : सेजल पवारचं करिअर संपणार ? KEM रुग्णालय मोठा निर्णय घेणार ?

मुंबई : सध्या सोशल मीडियावर दोन व्हिडिओ तुफान वायरल होत आहेत. एक म्हणजे ३७० ची बिर्याणी आणि डॉ. सेजल पवार हिचं

Ashok Kharat Case : 'या' सरकारी वकिलाच्या एंट्रीने अशोक खरातला फुटला घाम ! आता खरातची सुटका नाहीच

Ashok Kharat Case : नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला अशोक खरात प्रकरणाने हादरवून सोडले आहे. आता याच अशोक खरात प्रकरणात एक मोठी