कृत्रिम फुले आणि खेळण्यांच्या रंगांमुळे कर्करोगाचा धोका; विक्रम पाचपुते यांचा इशारा

मुंबई: विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी एक गंभीर आरोग्य समस्या जगासमोर मांडली आहे. आपण सजावटीसाठी वापरत असलेली कृत्रिम फुले आणि लहान मुलांची स्वस्त खेळणी यांमधील घातक रंगांमुळे कर्करोग आणि फुफ्फुसांचे आजार बळावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



नॅनो पार्टिकल्सद्वारे शरीरात शिरकाव


पाचपुते यांनी सांगितले की, कृत्रिम फुलांमधून रंग 'नॅनो पार्टिकल्स'च्या स्वरूपात बाहेर पडतात. हे कण श्वासोच्छवासाद्वारे आपल्या शरीरात जातात, ज्यामुळे श्वसनविकार आणि कर्करोगाचा मोठा धोका निर्माण होतो. त्यांनी एक प्रयोग सुचवला की, एखादा रंगीत फुगा किंवा खेळणे उन्हात ठेवल्यास एका दिवसात त्याचा रंग फिका पडतो. हा रंग हवेत मिसळून प्रदूषण वाढवतो आणि तीच हवा आपण श्वासाद्वारे आत घेतो.



सरकारला विनंती


"कायदे अनेक आहेत, परंतु जोपर्यंत दोषींना शिक्षा (Conviction) होत नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही," असे पाचपुते यांनी नमूद केले. शासकीय कार्यक्रम असोत किंवा घरगुती समारंभ, सर्वत्र कृत्रिम फुलांचा वापर वाढला आहे. यावर सरकारने कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा उत्पादनांवर नियंत्रण आणावे, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.



चायनीज आणि मिठाईतील घातक रंगांमुळे कर्करोगाचा धोका


"आपण जे अन्न खातोय, त्यातील भडक रंग आपल्या आरोग्यासाठी काळ ठरू शकतात," असा गंभीर इशारा भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी दिला आहे. स्वस्त चायनीज स्टॉल्स आणि मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांवर जोरदार प्रहार केला. पाचपुते यांनी सांगितले की, बुंदी, जिलेबी आणि विशेषतः स्वस्त चायनीज पदार्थांमध्ये (उदा. शेजवान चटणी किंवा राईस) 'सनसेट यलो' सारखे घातक पिगमेंट्स वापरले जातात. "जर चायनीज खाल्ल्यानंतर केवळ काही सेकंदात तुमच्या हाताचा रंग निघत नसेल, तर विचार करा तुमच्या आतड्यांचे काय हाल होत असतील," असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नैसर्गिक रंगांच्या तुलनेत हे कृत्रिम रंग अत्यंत स्वस्त असल्याने त्यांचा वापर सर्रास होतो, परंतु हे रंग थेट मानवी शरीरासाठी विषारी (Toxic) आहेत.



तंबाखू न खाणाऱ्यांनाही कॅन्सर का?


अनेक लोक तंबाखू, सुपारी किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करत नाहीत, तरीही त्यांना कर्करोग (Cancer) होतो. याचे मुख्य कारण आपण नकळतपणे अन्नाद्वारे शरीरात घेतलेले हे घातक केमिकल्स आणि नॅनो पार्टिकल्स आहेत, असे मत पाचपुते यांनी व्यक्त केले.


या प्रश्नावर शासनाने काय भूमिका घ्यावी, असे विचारले असता पाचपुते म्हणाले की, "कायदा आहे, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा नसेल, तर अशा घातक वस्तूंवर थेट बंदी आणली पाहिजे." त्यांनी सरकारला विनंती केली की, नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या रंगांवर कठोर कारवाई करण्यात यावी.



होळीसाठी पालकांना आवाहन


येत्या होळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांसाठी खेळणी, पिचकाऱ्या किंवा रंग घेताना ते उन्हात ठेवून तपासा. जर त्यांचा रंग सहज निघत असेल, तर अशी खेळणी मुलांच्या हातात देऊ नका, कारण ती आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ही एक 'सामाजिक जबाबदारी' (Social Responsibility) असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी

Malnourished children : तीव्र कुपोषित बालकांचा घसरला आलेख

प्रशासनाच्या प्रयत्नांना यश पालघर: कुपोषित बालकांचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचे

Corridor : विरार-अलिबाग मार्गिकेचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात; कोकण विकासाला मिळणार चालना

मुंबई: राज्यातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या 'विरार-अलिबाग बहुउद्देशीय

Vijay Singhal : विजय सिंघल यांची धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विशेष कार्य अधिकारी पदी नियुक्ती

 राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे

Maharashtra Police : महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारकडून ७३३.२८ कोटी मंजूर

सागरी सुरक्षा, सायबर सेल आणि 'एआय' तंत्रज्ञानावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान व