बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी क्रमांक १८६४ (MH-01 AP 0748) अखेर इतिहासजमा झाली. ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या प्रवासी संघटनेकडून या बसगाडीला एक आगळावेगळा, भावपूर्ण आणि सर्वसमावेशक असा निरोप देण्यात आला.


सन २००९ साली जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास अभियान (JNNURM) अंतर्गत बेस्ट उपक्रमात अशोक लेलँडच्या एकूण ७५० बसगाड्या दाखल झाल्या होत्या. या ताफ्यातील ही शेवटची मोठ्या आकाराची प्रवासी बस होती. पंधरा वर्षे मुंबईच्या रस्त्यांवर अखंड धावत, लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारी सेवा पुरवणाऱ्या या बसगाडीने अखेर आपला अंतिम प्रवास पूर्ण केला.


या शेवटच्या प्रवासानिमित्त ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ संस्थेने एक अनोखा निरोप सोहळा आयोजित केला. संस्थेचे पदाधिकारी, काही हौशी बसप्रेमी मंडळी आणि बेस्ट उपक्रमाचे अभियांत्रिकी कर्मचारी यांनी स्वतः दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी हार, फुले, पताका आणि फुगे यांचा संगम साधून या बसगाडीची आकर्षक सजावट केली. विशेष म्हणजे, अभियांत्रिकी विभागाने संस्थेच्या आग्रहास्तव या बसगाडीची तिच्या निवृत्तीफेरी करिता तिच्या मूळ रंगात पुन्हा रंगरंगोटी केली, तर बेस्टचे निवृत्त अभियंता सुहास पेडणेकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बसगाडीचा ताफा क्रमांक आणि आगाराची पुन्हा नोंद कोरली.


“काही लोकं स्वतःसाठी भाड्याने बस आरक्षित करून निरोप सोहळे साजरे करतात, परंतु आम्ही या विशेष निरोप सोहळ्यात बेस्टचे कर्मचारी आणि प्रवासी दोघांनाही सामील करून हा सर्वसमावेशक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला,”असे आपली बेस्ट आपल्याचसाठी संस्थेचे सरचिटणीस सिद्धेश म्हात्रे यांनी सांगितले.
बस सजावटीनंतर मालवणी आगारातील वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी प्रसाद दीक्षित यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि केक कापून गाडीला तिच्या शेवटच्या प्रवासासाठी बसमार्ग क्रमांक २०७ वरून दहिसर बस स्थानकाकडे मार्गस्थ केले. या विशेष फेरीतील प्रत्येक प्रवाशाला संस्थेच्यावतीने तिकिटासोबत एक गोड आठवण म्हणून चॉकलेट चे वाटप करण्यात आले.


सद्यस्थितीला बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या बसगाड्या उरल्या आहेत. येत्या १५ नोव्हेंबर २०२५ रोजी शेवटची मिडी बसगाडी सुद्धा निवृत्त होणार असून, त्यामुळे भांडुप आणि मालाड विभागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर

Central Railway New Rule : 'धूम्रपान ते फेरीवाले…' रेल्वेत गैरप्रकार करणाऱ्यांची खैर नाही; रेल्वे कायद्यात झाले 'हे' मोठे बदल

मुंबई : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! रेल्वे कायदा, १९८९ मधील अनेक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्या

Maharashtra Rojgar Melava 2026 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी मोठी संधी! राज्यात होणार १ हजार रोजगार मेळावे; मंत्री मंगलप्रभात लोढांचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

Nitesh Rane : रत्नागिरीला मिळणार जागतिक ओळख! भगवती बंदरात अत्याधुनिक क्रुझ टर्मिनलला गती; पर्यटन, रोजगाराला मोठी चालना

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदर (Bhagwati Port) येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक क्रुझ टर्मिनल (cruise terminal)