बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी क्रमांक १८६४ (MH-01 AP 0748) अखेर इतिहासजमा झाली. ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ या प्रवासी संघटनेकडून या बसगाडीला एक आगळावेगळा, भावपूर्ण आणि सर्वसमावेशक असा निरोप देण्यात आला.


सन २००९ साली जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास अभियान (JNNURM) अंतर्गत बेस्ट उपक्रमात अशोक लेलँडच्या एकूण ७५० बसगाड्या दाखल झाल्या होत्या. या ताफ्यातील ही शेवटची मोठ्या आकाराची प्रवासी बस होती. पंधरा वर्षे मुंबईच्या रस्त्यांवर अखंड धावत, लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि परवडणारी सेवा पुरवणाऱ्या या बसगाडीने अखेर आपला अंतिम प्रवास पूर्ण केला.


या शेवटच्या प्रवासानिमित्त ‘आपली बेस्ट आपल्याचसाठी’ संस्थेने एक अनोखा निरोप सोहळा आयोजित केला. संस्थेचे पदाधिकारी, काही हौशी बसप्रेमी मंडळी आणि बेस्ट उपक्रमाचे अभियांत्रिकी कर्मचारी यांनी स्वतः दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी हार, फुले, पताका आणि फुगे यांचा संगम साधून या बसगाडीची आकर्षक सजावट केली. विशेष म्हणजे, अभियांत्रिकी विभागाने संस्थेच्या आग्रहास्तव या बसगाडीची तिच्या निवृत्तीफेरी करिता तिच्या मूळ रंगात पुन्हा रंगरंगोटी केली, तर बेस्टचे निवृत्त अभियंता सुहास पेडणेकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बसगाडीचा ताफा क्रमांक आणि आगाराची पुन्हा नोंद कोरली.


“काही लोकं स्वतःसाठी भाड्याने बस आरक्षित करून निरोप सोहळे साजरे करतात, परंतु आम्ही या विशेष निरोप सोहळ्यात बेस्टचे कर्मचारी आणि प्रवासी दोघांनाही सामील करून हा सर्वसमावेशक कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला,”असे आपली बेस्ट आपल्याचसाठी संस्थेचे सरचिटणीस सिद्धेश म्हात्रे यांनी सांगितले.
बस सजावटीनंतर मालवणी आगारातील वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी प्रसाद दीक्षित यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि केक कापून गाडीला तिच्या शेवटच्या प्रवासासाठी बसमार्ग क्रमांक २०७ वरून दहिसर बस स्थानकाकडे मार्गस्थ केले. या विशेष फेरीतील प्रत्येक प्रवाशाला संस्थेच्यावतीने तिकिटासोबत एक गोड आठवण म्हणून चॉकलेट चे वाटप करण्यात आले.


सद्यस्थितीला बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या बसगाड्या उरल्या आहेत. येत्या १५ नोव्हेंबर २०२५ रोजी शेवटची मिडी बसगाडी सुद्धा निवृत्त होणार असून, त्यामुळे भांडुप आणि मालाड विभागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Rat poison found in watermelon : पायधुनी कलिंगड मृत्यू प्रकरण : उंदीर मारणाऱ्या 'झिंक फॉस्फाईड'वर जगात कोणताही उतारा का नाही? वाचा सविस्तर

मुंबई : मुंबईतील पायधुनी (Mumbai Paydhuni) परिसरात २६ एप्रिलच्या पहाटे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला

Mumbai paydhuni four death watermelon : कलिंगड नव्हे, तर 'या' कारणामुळे गेला डोकाडिया कुटुंबाचा जीव; मृत्यूचं गूढ अखेर उकललं!

मुंबई : मुंबईतील पायधुनी(Mumbai Paydhuni Watermelon Case) परिसरात डोकाडिया कुटुंबावर (Dikadia Family)ओढवलेल्या दुर्दैवी प्रसंगामुळे संपूर्ण

Marijuana Cultivation : भांडुप जलाशय टेकडीवर गांजाची शेती, भाजप नगरसेविकेने आणली निदर्शनास

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भांडुप जलाशय टेकडी येथील डोंगराळ भागात काही समाजकंटकांनी बेकायदेशीररित्या गांजाची

BMC Staff : महानगरपालिका कर्मचारीच स्व-गणना सदिच्छादूत

मेट्रो, रेल्वे, बस स्थानक, सार्वजनिक ठिकाणी स्व-गणना संदर्भात जनजागृती  मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आतापर्यंत

Water Cut : ग्रॅण्टरोड, गिरगांव भायखळा, महालक्ष्मी,वरळी आदी काही भागांमध्ये शुक्रवारीही पाणीपुरवठा राहणार बंद

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य

BJP : शुक्रवारपासून भाजप नालेसफाईच्या पाहणी मोहिमेवर..

मुंबई अध्यक्ष, पालकमंत्री, नगरसेवक महापालिका अधिकाऱ्यांसमवेत करणार पाहणी मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील