भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) बाबत तारखा जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी आयोजित केली आहे.


अहवालानुसार, पहिल्या टप्प्यात १० ते १५ राज्यांचा समावेश विशेष गहन पुनरीक्षणसाठी केला जाणार आहे. विशेषत: २०२६ मध्ये विधानसभाच्या निवडणुका ज्या राज्यांमध्ये होणार आहेत अशी राज्ये विशेष गहन पुनरीक्षणसाठी सर्वप्रथम निवडली जातील. ज्यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पॉंडीचेरी या राज्यांचा समावेश असेल. विशेष गहन पुनरीक्षण ही मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्यात नव्या मतदारांचे नोंदणीकरण, मृत व्यक्तींची नावे वगळणे, दुबार नोंदी काढून टाकणे आणि स्थलांतरासंबंधी बदल करणे यांचा समावेश होतो.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने