भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण (SIR) बाबत तारखा जाहीर करणार असल्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद संध्याकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी आयोजित केली आहे.


अहवालानुसार, पहिल्या टप्प्यात १० ते १५ राज्यांचा समावेश विशेष गहन पुनरीक्षणसाठी केला जाणार आहे. विशेषत: २०२६ मध्ये विधानसभाच्या निवडणुका ज्या राज्यांमध्ये होणार आहेत अशी राज्ये विशेष गहन पुनरीक्षणसाठी सर्वप्रथम निवडली जातील. ज्यात तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पॉंडीचेरी या राज्यांचा समावेश असेल. विशेष गहन पुनरीक्षण ही मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करण्याची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. ज्यात नव्या मतदारांचे नोंदणीकरण, मृत व्यक्तींची नावे वगळणे, दुबार नोंदी काढून टाकणे आणि स्थलांतरासंबंधी बदल करणे यांचा समावेश होतो.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील