एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या सामुहिक आत्महत्येत एकूण पाचजणांचा समावेश होता. ज्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर चारजणांवर नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना पनवेल तालुक्यामधील जावळे गावामध्ये घडली. या घटनेसंबंधी उलवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करित आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, जावळे गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. या पाचही जणांनी चहामधून विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. हे कुटुंब मूळचे नेपाळचे असून पनवेलमधील जावळे गावात अनेक दिवसांपासून राहत होते. मागील दोन ते तीन दिवसापासून त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजारच्यांना काहीतरी घडल्याचा संशय आल्याने त्यांनी यासंबंधींची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना दिली. सुरक्षा यंत्रणा तात्काळ संबंधीत जागी पाचारण झाली. त्यावेळी घरात सर्वजण बेशुद्ध अवस्थेत आढळले.




सुरक्षा यंत्रणेतील जवानांनी तातडीने या सर्वांना उपचारासाठी पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा संतोष बिरा लूहार (वय २२) याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच बेशुद्ध अवस्थेतील रमेश बिरा लोहार (वय २३), त्यांची पत्नी बसंती व पाच वर्षांचा मुलगा आयुष आणि दोन वर्षांचा आर्यन यांच्यावर उपचार सुरू झाले. अतिदक्षता विभागाची गरज असल्याने या चौघांना पुढील उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील दोन लहान मुलांची प्रकृती स्थिर असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Vladimir Putin : भारतावर निर्बंधांचा परिणाम होणार नाही, पुतिन यांचा मोदींवर विश्वास

मॉस्को : ‘भारत आणि रशिया यांच्यातील सहकार्य आणि व्यापारी भागीदारी अत्यंत मजबूत आहे. कोणत्याही देशाने दिलेल्या

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

Chalisgaon : चाळीसगाव महावितरणाचा अजब कारभार: अधिकारी 'मस्तवाल', जनता 'बेहाल'!

Chalisgaon :  चाळीसगाव शहरासह परिसरात महावितरण विभागाचा मनमानी कारभार शिगेला पोहोचला असून, सध्या 'त्रस्त नागरिक आणि

BCCI SELECTION : BCCI कडून दोन मोठ्या स्पर्धांसाठी भारतीय संघांची घोषणा; श्रेयस अय्यरकडे नेतृत्व, तिलक वर्मा उपकर्णधार

MUMBAI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी इंग्लंड दौरा 2026 आणि आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (जपान) यासाठी भारतीय पुरुष

BCCI SQUAD SELECTION : भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीसाठी बीसीसीआयची बैठक सुरू; श्रेयस अय्यरकडे सोपवली जाणार धुरा?

BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) वरिष्ठ निवड समिती आज मुंबईतील मुख्यालयात महत्त्वाची बैठक घेत आहे. या बैठकीत