पुणे एसटी विभागाची दिवाळी दरम्यान कोटींची कमाई! सणानिमित्त सोडल्या होत्या जादा बस

पुणे: यावर्षी दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या तीन दिवसांत एसटीच्या सहा हजार फेऱ्या झाल्या असून, अडीच लाख नागरिकांनी प्रवास केला. विशेषतः मराठवाड्यात गेल्या वर्षी तीन दिवसांत ६०० फेऱ्या झाल्या होत्या आणि यावर्षी ३०० फेऱ्यांमध्ये वाढ होऊन एकूण ९०० फेऱ्या एसटीकडून मारण्यात आल्या. तसेच विदर्भातील फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. पुणे एसटीच्या या उपक्रमामुळे पुणे एसटी विभागाला सहा कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन कोटी दहा लाख रुपये इतका जादा महसूल मिळाला आहे.


नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात शहराबाहेरून राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळी सणाला गावी जाऊन येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे एसटी विभागातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण या सर्व भागात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात तीन दिवस एसटीला प्रचंड गर्दी होती. विशेषतः पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. यामुळे शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून अधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. याचा फायदा एसटी महामंडळाला झाला आहे.


एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या लालपरी आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणे विभागासह इतर विभागातील ताफ्यातील बसची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणे विभागातून सर्वाधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर सगळीकडे लालपरीच्या रांगा लागल्या होत्या.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार