पुणे एसटी विभागाची दिवाळी दरम्यान कोटींची कमाई! सणानिमित्त सोडल्या होत्या जादा बस

पुणे: यावर्षी दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या तीन दिवसांत एसटीच्या सहा हजार फेऱ्या झाल्या असून, अडीच लाख नागरिकांनी प्रवास केला. विशेषतः मराठवाड्यात गेल्या वर्षी तीन दिवसांत ६०० फेऱ्या झाल्या होत्या आणि यावर्षी ३०० फेऱ्यांमध्ये वाढ होऊन एकूण ९०० फेऱ्या एसटीकडून मारण्यात आल्या. तसेच विदर्भातील फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. पुणे एसटीच्या या उपक्रमामुळे पुणे एसटी विभागाला सहा कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन कोटी दहा लाख रुपये इतका जादा महसूल मिळाला आहे.


नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात शहराबाहेरून राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळी सणाला गावी जाऊन येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे एसटी विभागातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण या सर्व भागात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात तीन दिवस एसटीला प्रचंड गर्दी होती. विशेषतः पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. यामुळे शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून अधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. याचा फायदा एसटी महामंडळाला झाला आहे.


एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या लालपरी आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणे विभागासह इतर विभागातील ताफ्यातील बसची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणे विभागातून सर्वाधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर सगळीकडे लालपरीच्या रांगा लागल्या होत्या.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी