पुणे एसटी विभागाची दिवाळी दरम्यान कोटींची कमाई! सणानिमित्त सोडल्या होत्या जादा बस

पुणे: यावर्षी दिवाळीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागातून दि. १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या तीन दिवसांत एसटीच्या सहा हजार फेऱ्या झाल्या असून, अडीच लाख नागरिकांनी प्रवास केला. विशेषतः मराठवाड्यात गेल्या वर्षी तीन दिवसांत ६०० फेऱ्या झाल्या होत्या आणि यावर्षी ३०० फेऱ्यांमध्ये वाढ होऊन एकूण ९०० फेऱ्या एसटीकडून मारण्यात आल्या. तसेच विदर्भातील फेऱ्यांमध्येही वाढ झाली आहे. पुणे एसटीच्या या उपक्रमामुळे पुणे एसटी विभागाला सहा कोटी रुपये महसूल मिळाला आहे. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन कोटी दहा लाख रुपये इतका जादा महसूल मिळाला आहे.


नोकरी आणि व्यवसायानिमित्त पुण्यात शहराबाहेरून राहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दिवाळी सणाला गावी जाऊन येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे एसटी विभागातून विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि कोकण या सर्व भागात स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे गेल्या आठवड्यात तीन दिवस एसटीला प्रचंड गर्दी होती. विशेषतः पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त असते. यामुळे शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून अधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. याचा फायदा एसटी महामंडळाला झाला आहे.


एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या लालपरी आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुणे विभागासह इतर विभागातील ताफ्यातील बसची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणे विभागातून सर्वाधिक जादा बस सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामार्गावर सगळीकडे लालपरीच्या रांगा लागल्या होत्या.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी