कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या

मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, कोचची (डब्यांची) संख्या वाढवण्यासोबतच तिच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय झाला आहे.


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता १६ कोच अर्थात डबे असतील. यामुळे एकाचवेळी अनेकांना प्रवास करणे शक्य होणार आहे.


सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील सहा दिवस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही १६ कोचची गाडी धावणार आहे. हा बदल २२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे नवे वेळापत्रक (२२ ऑक्टोबर २०२५ पासून लागू)


ट्रेन क्रमांक 22229 (मुंबई CSMT ते मडगाव, गोवा) - मुंबई CSMT येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल आणि मडगाव (गोवा) स्टेशनवर दुपारी १.१० वाजता पोहचेल.


ट्रेन संख्या 22230 (मडगाव, गोवा ते मुंबई CSMT) - मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल आणि मुंबई CSMT येथे रात्री १०.३० वाजता पोहचेल.

Comments
Add Comment

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि