कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी, 'वंदे भारत'च्या फेऱ्या वाढल्या

मुंबई : कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईहून कोकणात आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या देशातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, कोचची (डब्यांची) संख्या वाढवण्यासोबतच तिच्या फेऱ्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय झाला आहे.


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आता १६ कोच अर्थात डबे असतील. यामुळे एकाचवेळी अनेकांना प्रवास करणे शक्य होणार आहे.


सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील सहा दिवस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही १६ कोचची गाडी धावणार आहे. हा बदल २२ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला आहे.


मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव वंदे भारत एक्सप्रेसचे नवे वेळापत्रक (२२ ऑक्टोबर २०२५ पासून लागू)


ट्रेन क्रमांक 22229 (मुंबई CSMT ते मडगाव, गोवा) - मुंबई CSMT येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल आणि मडगाव (गोवा) स्टेशनवर दुपारी १.१० वाजता पोहचेल.


ट्रेन संख्या 22230 (मडगाव, गोवा ते मुंबई CSMT) - मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल आणि मुंबई CSMT येथे रात्री १०.३० वाजता पोहचेल.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा