काँग्रेसची भूमिका स्पष्ट : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती नाकारली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीरपणे सांगितले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या कोणत्याही गटासोबत युती करणार नाही.


भाई जगताप म्हणाले की, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना स्पष्टपणे सांगितले होते की आपण शिवसेना (ठाकरे गट) किंवा मनसेसोबत महापालिका निवडणुकीत एकत्र जाणार नाही. हीच भूमिका मी काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत रमेश चेन्नीथला यांच्या समोरही मांडली होती.”


त्यांनी हेही अधोरेखित केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, केवळ नेत्यांच्या नाहीत. अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. “मुंबईतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, काँग्रेसने या निवडणुकीत स्वबळावर लढावे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांना दिला पाहिजे,” असेही ते म्हणाले.


भाई जगताप यांनी स्पष्ट केले की काँग्रेसने कधीही राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा विचारही केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत देखील युती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


या पार्श्वभूमीवर काँग्रेस मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले की, “राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत प्रत्येक नेत्याचे मत ऐकले गेले असून, अंतिम निर्णय काँग्रेस सर्व संबंधितांशी चर्चा करून घेईल.”


या वक्तव्यांमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेसची दिशा आणि धोरण स्पष्ट झाली असून, स्थानिक पातळीवरील घडामोडींवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०