काँग्रेसची भूमिका स्पष्ट : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती नाकारली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीरपणे सांगितले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या कोणत्याही गटासोबत युती करणार नाही.


भाई जगताप म्हणाले की, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना स्पष्टपणे सांगितले होते की आपण शिवसेना (ठाकरे गट) किंवा मनसेसोबत महापालिका निवडणुकीत एकत्र जाणार नाही. हीच भूमिका मी काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत रमेश चेन्नीथला यांच्या समोरही मांडली होती.”


त्यांनी हेही अधोरेखित केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, केवळ नेत्यांच्या नाहीत. अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. “मुंबईतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, काँग्रेसने या निवडणुकीत स्वबळावर लढावे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांना दिला पाहिजे,” असेही ते म्हणाले.


भाई जगताप यांनी स्पष्ट केले की काँग्रेसने कधीही राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा विचारही केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत देखील युती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


या पार्श्वभूमीवर काँग्रेस मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले की, “राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत प्रत्येक नेत्याचे मत ऐकले गेले असून, अंतिम निर्णय काँग्रेस सर्व संबंधितांशी चर्चा करून घेईल.”


या वक्तव्यांमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेसची दिशा आणि धोरण स्पष्ट झाली असून, स्थानिक पातळीवरील घडामोडींवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य