काँग्रेसची भूमिका स्पष्ट : मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंशी युती नाकारली

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी जाहीरपणे सांगितले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या कोणत्याही गटासोबत युती करणार नाही.


भाई जगताप म्हणाले की, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना स्पष्टपणे सांगितले होते की आपण शिवसेना (ठाकरे गट) किंवा मनसेसोबत महापालिका निवडणुकीत एकत्र जाणार नाही. हीच भूमिका मी काँग्रेसच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत रमेश चेन्नीथला यांच्या समोरही मांडली होती.”


त्यांनी हेही अधोरेखित केले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, केवळ नेत्यांच्या नाहीत. अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, हीच आमची भूमिका आहे. “मुंबईतील कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, काँग्रेसने या निवडणुकीत स्वबळावर लढावे. त्यामुळे निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांना दिला पाहिजे,” असेही ते म्हणाले.


भाई जगताप यांनी स्पष्ट केले की काँग्रेसने कधीही राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा विचारही केलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत देखील युती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.


या पार्श्वभूमीवर काँग्रेस मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनी सांगितले की, “राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत प्रत्येक नेत्याचे मत ऐकले गेले असून, अंतिम निर्णय काँग्रेस सर्व संबंधितांशी चर्चा करून घेईल.”


या वक्तव्यांमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील काँग्रेसची दिशा आणि धोरण स्पष्ट झाली असून, स्थानिक पातळीवरील घडामोडींवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२

महापौर, उपमहापौरांसह समित्यांच्या अध्यक्षांच्या सारथ्यासाठी वाहने सज्ज

महापौरांना इनोव्हा, तर समिती अध्यक्षांना भगव्या पट्यांच्या स्कॉर्पिओ सचिन धानजी मुंबई : मुंबईच्या महापौर तसेच

शिरोडकर मंडईतील निम्म्या कोळी भगिनींचा बाजार उठवला

मंडईत टॉयलेटसाठी नाही पाणी, गटार तुंबलेली मुंबई : परेल येथील शिरोडकर मंडईचा पुनर्विकासाचे काम

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून