दहा महिन्यांमध्ये गॅस सिलिंडर स्फोटांच्या ४७ दुघर्टना... एवढ्यांचे बळी, एवढे झाले जखमी

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईमध्ये सध्या आगीच्या दुघर्टनांमध्ये वाढत होत असून यामध्ये प्राधान्य क्रम हा सदोष विद्युततारांमुळे घटनांचा असला तरी त्याखालोखाल घरगुती आणि कमर्शियल वापराच्या गॅस सिलिंडरमुळे लागलेल्या आगींची संख्याही लक्षणीय आहे. या जानेवारीपासून १५ ऑक्टोबर या कालावधीतच मुंबईत गॅस सिलिंडर स्फोटापासून लागलेल्या आगींची संख्या ४७ एवढी आहे. या सर्व दुघर्टनांमध्ये १८ जण जखमी आणि ०९ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. यासर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेदृष्टीकोनातून मुंबई अग्निशमन दलाकडून जनजागृती करण्यात येत असली तरी नागरिकांकडून गॅस सिलिंडर वापरासंदर्भातच दुर्लक्ष केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.


सिलिंडर स्फोटाच्या दुघर्टनांमध्ये गॅस गळती हेच प्रमुख कारण पुढे आले असून जानेवारीपासून घडलेल्या ४७ दुघर्टनांमध्ये अनेक निष्पाप लोकांचे जीव जावून कुटुंबांचे आणि मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.


जानेवारी ते ऑक्टोबर २०२५मधील गॅस सिलेंडर स्फोटांच्या दुघर्टना


महिना ------ --दुघर्टना----- जखमी संख्या ----मृत संख्या


जानेवारी --------०९ ------------- ०४-------------००


फेब्रुवारी --------०६-------------- ००-----------००


मार्च ------------०८------------- ००-----------००


एप्रिल -----------०२------------- ००------------००


मे --------------०४-------------- ००------------००


जून -----------०२ ------------ ०१------------- ००


जुलै---------- ०४------------ ०७------------- ०२


ऑगस्ट ------ ०२----------- ०० ---------------००


सप्टेंबर -------०९----------- ०६ ----------------०६


ऑक्टोबर----- ०१----------- ००---------------- ००


सिलिंडर स्फोटामुळे आजवर झालेल्या मोठ्या दुघर्टना




  1. कांदिवलीत एका कॅटरिंग युनिटमध्ये सिलिंडर स्फोटा ३ महिलांचा होरपळून मृत्यू, ४ जण जखमी धारावीत सिलिंडर स्फोटामुळे ५ जणांचा मृत्यू आणि १७ जण जखमी

  2. लालबागमधील लग्न कार्याच्या झालेल्या सिलिंडर स्फोटात एकूण ९ जणांचा मृत्यू, १६जण जखमी

  3. वांद्रे येथे गॅस सिलिंडर स्फोटामुळे दुमजली घर कोसळून १५ जण जखमी

  4. माहिम येथील फूड स्टोअरमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू ०८ जण जखमी.


गॅस सिलिंडर स्फोटाची काय आहेत कारणे




  1. गॅस पाईप किंवा नळी (Hose Pipe) जुनी होणे किंवा खराब होणे.

  2. रेग्युलेटरमध्ये बिघाड.

  3. गॅसची गळती होत असतानाही दुर्लक्ष करणे किंवा त्वरित उपाययोजना न करणे.

  4. सुरक्षिततेचे नियम न पाळता व्यावसायिक वापर करणे.

  5. चाळी किंवा अरुंद जागेत योग्य हवा जायला जागा नसताना गॅस गळती होणे.


काय काळजी घ्यावी? (सुरक्षिततेसाठी उपाययोजना)




  1. सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी कशी घ्याल काळजी

  2. गळती तपासणी: गॅसचा वास आल्यास, त्वरित गॅसचा रेग्युलेटर बंद करा.

  3. वायुविजन (Ventilation): गॅसचा वास येत असल्यास, घरातील आणि स्वयंपाकघरातील खिडक्या, दरवाजे लगेच उघडा. हवा खेळती ठेवा.

  4. वीज उपकरणे टाळा: गॅस गळतीची शंका असल्यास, विजेचे दिवे, पंखे किंवा कोणतेही विद्युत उपकरण चालू किंवा बंद करू नका. यामुळे ठिणगी पडून स्फोट होऊ शकतो.

  5. माचिस/लायटरचा वापर नको: गॅस गळती तपासण्यासाठी चुकूनही आगपेटीतील काडी किंवा लायटर वापरू नका.

  6. लगेच संपर्क साधा: गॅस वितरक कंपनीच्या (Distributor) आपत्कालीन क्रमांकावर किंवा अग्निशमन दलाशी (101) तातडीने संपर्क साधा.

  7. सुरक्षित उपकरणे: गॅस नळी (Hose Pipe) आणि रेग्युलेटर हे प्रमाणित (ISI Mark) आणि चांगल्या गुणवत्तेचे असावेत, तसेच ते कंपनीने ठरवून दिलेल्या कालावधीत बदलावेत.

  8. योग्य जागा: सिलिंडर नेहमी सरळ आणि हवेशीर जागी ठेवावा.

  9. व्यावसायिक वापर: व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरसाठी आवश्यक असलेले सर्व सुरक्षा नियम आणि मानके काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री