कफ परेड येथील चाळीत भीषण आग; एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, तीन जण जखमी

मुंबई: मुंबईतील कफ परेड परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. दिवाळीच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार ही घटना कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, शिवशक्ती नगर, मच्छिमार नगर ०३, कफ परेड येथे ही दुर्घटना घडली. पहाटे ०४:१५ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आगीमुळे घरातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, तीन इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि इतर घरगुती वस्तूंचे नुकसान झाले.


आग लागल्याची माहिती समजताच बीएमसीच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि ही आग ०४:३५ वाजता पूर्णपणे विझवली. अग्निशमन दलासोबत, पोलीस, बेस्ट कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका तातडीने मदतीसाठी घटनास्थळी पोहोचल्या होत्या.


या दुर्घटनेत जखमी झालेल्या चार जणांना तत्काळ उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. यश विठ्ठल खोत (पुरुष, वय १५) यास रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. देवेंद्र चौधरी (पुरुष, वय ३०): यास रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये (ICU) दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. विराज खोत (पुरुष, वय १३) आणि संग्राम कुर्डे (पुरुष, वय २५): यास दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

Comments
Add Comment

आता पावसाळ्यात मध्य रेल्वेच्या रुळावर पाणी साचणार नाही! भुयारी टाकी बसवण्याचा मुंबई पालिकेचा नवा प्रकल्प

मुंबई: पावसाळ्यात दरवर्षी मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी भरते. तसेच अती पाऊस पडल्यावर मुंबईतील रेल्वेच्या

वंदे भारत एक्स्प्रेसला ६ तास उशीर

मुंबई : वेगवान प्रवासासाठी ओळखली जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास विलंबाने धावली. वंदे भारतच्या वेळापत्रकात

भारताने प्राचीन धर्मग्रंथांची िशकवण जोपासावी: मोहन भागवत

सरसंघचालकांच्या हस्ते ‘आर्य युग विषय कोशा’चे लोकार्पण मुंबई : "भारताला प्राचीन विद्या आणि संस्कृतीची मोठी

नरकचतुर्दशी : अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वध!

मुंबई : आज सर्वत्र दिवाळीच्या उत्साहात नरकचतुर्दशी साजरी होत आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी

दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धीसह सौहार्द घेऊन येवो - उपमुख्यमंत्री पवार

मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि ऐक्याचा सण आहे. हा सण प्रत्येकाच्या जीवनात नव्या आशा, नव्या संधी आणि

राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आरोप: जयकुमार गोरे म्हणाले, "मतदार याद्या पहिल्यांदाच पाहिल्या असाव्यात!"

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे