आत्महत्या करण्याऐवजी आमदाराला कापा; शेतकरी परिषदेत बच्चू कडूंची जीभ घसरली

बुलढाणा: गेल्या दोन महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या. या पार्श्वभूमीवर सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे, मात्र ती अद्याप खात्यांवर न पोहोचल्याने विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


याच संदर्भात, प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद आयोजित केली होती. या परिषदेत बोलताना त्यांनी एक खळबळजनक विधान केले आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.



'शेतकऱ्यांनी आमदाराला कापावे'


बच्चू कडू म्हणाले की, "आज दिवाळीच्या दिवशी आपल्याला दु:खाची परिषद घ्यावी लागत आहे. तुम्ही विचारांची लढाई सोडून जाती-पातीची लढाई सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांवर ही वाईट वेळ आली आहे."


शेतकरी कोणत्याही जाती-धर्माचा असला तरी एक शेतकरी म्हणून एकत्र येऊ शकत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "याचा निळा, त्याचा भगवा, कुणाचा हिरवा, कुणाचा पिवळा.. या सर्व रंगाचे कापड आमच्या शेतक-याच्या कापसापासून बनते," असे ते म्हणाले.


यावेळी त्यांनी दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी जीव तोडून काम केले, त्यांचीही राखरांगोळी झाली. त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली आणि हिंगणघाटच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनीच त्यांना पाडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही निवडणुकीत पराभूत करण्यात आले होते, असे कडू म्हणाले.


आज शेतकरी संकटात आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. पण त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापावे (मारून टाकावे)? असे वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केले आहे.



भाजप आमदार प्रवीण दरेकरांचा पलटवार


बच्चू कडू यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर टीका केली आहे.


दरेकर म्हणाले, "बच्चू कडू यांनी बावळटपणा (बालिशपणा) सोडून सामाजिक काम करावे. अन्यथा, कापून टाकू, झाडून टाकू हे प्रकार त्यांच्यासोबत होऊ नयेत."

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०