अमरावतीत सलग २५ तासांत १५ हजार ७७३ डोसे !

विख्यात शेफ विष्णू मनोहर यांचा विक्रम


अमरावती : विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी अमरावती शहरात सलग २५ तासांत एकूण १५ हजार ७७३ डोसे बनवण्याचा नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे, अमरावतीनंतर आता ते थेट अमेरिकेत २६ तास डोसे बनवण्याच्या नव्या विक्रमासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी गेल्या वर्षी विष्णू मनोहर यांनी नागपुरात २४ तासांत १४ हजार ४०० डोसे बनवण्याचा विक्रम नोंदवला होता. आजच्या या नव्या विक्रमाची राज्यभरात चर्चा आहे.


अमरावती शहरात गुणवंत लॉन येथे शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून विष्णू मनोहर यांनी सलग २५ तास डोसे बनवण्याच्या विक्रमला सुरुवात केली. रविवारी सकाळी ६ वाजता त्यांनी १५ हजार ७०० डोसे बनवून आपला जुना विक्रम मोडीत काढला. पंचांनी मधे २० मिनिटे ब्रेक दिल्यावर विष्णू मनोहर यांनी गरम तव्यावर पुन्हा चवदार डोसे तयार करून अनेक अमरावतीकरांची सकाळ चवदार केली.


८ वाजता अखेरचा म्हणजे १५ हजार ७७३ वा डोसा त्यांनी तयार केला आणि त्यांच्या नव्या विक्रमाचा जल्लोष त्यांचे सहकारी आणि उपस्थित अमरावतीकरांनी टाळ्यांच्या कडकडाटाने केला. याप्रसंगी 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'च्या प्रतिनिधी पंच प्रवीण राऊत यांनी विष्णू मनोहर यांना पदक आणि प्रशस्तीपत्र बहाल करत त्यांच्या नव्या विक्रमाची घोषणा केली. अगदी पहाटे ३ वाजेपर्यंत अमरावतीकरांनी डोसा खाण्यासाठी गर्दी केली होती. पहाटे ३ ते ५ याच वेळेस शांतता होती. ५ वाजल्यापासून ८ वाजेपर्यंत अमरावतीकरांचा प्रचंड उत्साह अनुभवला," असे विष्णू मनोहर म्हणाले.


अमरावतीनंतर आता थेट 'मिशन अमेरिका'


"नागपूरला २४ तासांत डोसे तयार करण्याचा नोंदवलेला स्वतःचा विक्रम अमरावतीत मोडला. यापुढे असे दहा मॅरेथॉन पूर्ण करायचे असून, पुढचा विक्रम अमेरिकेत केला जाणार आहे,"  - विष्णू मनोहर




Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे