राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आरोप: जयकुमार गोरे म्हणाले, "मतदार याद्या पहिल्यांदाच पाहिल्या असाव्यात!"

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगावर बोट ठेवत एक धक्कादायक दावा केला आहे. "१ जुलै रोजी निवडणूक आयोगाने मतदार यादी गोठवली असताना त्यानंतर राज्यात तब्बल ९६ लाख बोगस मतदारांची भर घातली गेली आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


राज ठाकरे यांच्या या आरोपावर आता ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मजेशीर प्रत्यत्तर दिले आहे. "ज्यांनी आयुष्यात प्रथमच मतदार याद्या पाहिल्या असाव्यात, त्यांना मतदार बोगस आहे की खरे कसे कळणार?" असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.


त्याचप्रमाणे, "पूर्वी ईव्हीएमवर शंका घेतली, आता मतदार यादीवर संशय घेत आहेत. पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यावर अशी कारणं शोधली जात आहेत," अशी खोचक प्रतिक्रिया देत गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.


तसेच संजय राऊत यांनी मोर्चा काढण्याची दिलेली धमकीही गोरे यांनी फेटाळली. "त्यांच्या हातात आता काहीच राहिले नाही. लोकांचं पाठबळही संपलं आहे. त्यामुळे निवडणुकांपासून पळण्याचे हे नवे मार्ग आहेत," असे गोरे म्हणाले.

Comments
Add Comment

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील