राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर आरोप: जयकुमार गोरे म्हणाले, "मतदार याद्या पहिल्यांदाच पाहिल्या असाव्यात!"

मुंबई : महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगावर बोट ठेवत एक धक्कादायक दावा केला आहे. "१ जुलै रोजी निवडणूक आयोगाने मतदार यादी गोठवली असताना त्यानंतर राज्यात तब्बल ९६ लाख बोगस मतदारांची भर घातली गेली आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


राज ठाकरे यांच्या या आरोपावर आता ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मजेशीर प्रत्यत्तर दिले आहे. "ज्यांनी आयुष्यात प्रथमच मतदार याद्या पाहिल्या असाव्यात, त्यांना मतदार बोगस आहे की खरे कसे कळणार?" असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.


त्याचप्रमाणे, "पूर्वी ईव्हीएमवर शंका घेतली, आता मतदार यादीवर संशय घेत आहेत. पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्यावर अशी कारणं शोधली जात आहेत," अशी खोचक प्रतिक्रिया देत गोरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.


तसेच संजय राऊत यांनी मोर्चा काढण्याची दिलेली धमकीही गोरे यांनी फेटाळली. "त्यांच्या हातात आता काहीच राहिले नाही. लोकांचं पाठबळही संपलं आहे. त्यामुळे निवडणुकांपासून पळण्याचे हे नवे मार्ग आहेत," असे गोरे म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai : किरकोळ वादातून मारामरी,रागाच्या भरात मित्रानेच घेतला...नक्की काय घडलं ?

Mumbai :मुंबईतील एका परिसरात अत्यंत संतापजनक घटना घडली असून, बोलता बोलता वाद झाल्याने एका तरुणावर त्याच्याच

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

मकरसंक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना गोड

आचारसंहितेतून वाट काढली ! मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला

कोकण रेल्वेचा फुकट्या प्रवाशांना दणका

वर्षभरात २० कोटींचा दंड वसूल मुंबई : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी व्हावा यासाठी

घरोघरी गाठीभेटींवर उमेदवारांचा भर!

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मागील काही दिवसांपासून धडाधडाणाऱ्या राजकीय तोफा अखेर मंगळवारी

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई पोलीस सज्ज

२५ हजारांहून अधिक मनुष्यबळ तैनात मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार थंडावल्यांनतर मतदान आणि