नवीन वर्षात कल्याणवासियांची होणार वाहतूक कोंडीतून मुक्तता

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाल्यानंतर कल्याण स्टेशन परिसरात वाहतूक सुधारणा प्रकल्पाच्या कामास वेग आला आहे. मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक ते बैलबाजार चौक दरम्यान १६३० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीत भूसंपादन, एसटी स्थानकाच्या जागेवर काम करण्यास लागणारी ना हरकत, रेल्वेची जागा, हॉटेल्सची बांधकामे, गाळे धारकांचे पुनर्वसन यासारख्या तांत्रिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. आता यातील १३४६ मीटरचे काम पूर्ण झाले असून अडथळे दूर झाल्याने उर्वरित काम देखील वेगाने पूर्ण करणे शक्य होऊ शकेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


कल्याण रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पातील उड्डाणपुलाचे काम केव्हा पूर्ण होणार याकडे वाहतूककोंडीने ग्रासलेल्या नागरिकांचे लक्ष आहे. या उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री १२ .३० वाजल्यापासून पहाटे २ वाजेपर्यंत गर्डर बसवण्याचे काम करण्यात आले. कल्याण - डोंबिवली महापालिकेने पूल लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध केला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे कल्याण मधील नागरिकांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मार्गावरील कोलमडलेल्या वेळापत्रकाची चौकशी करून ठोस उपाययोजना करा

एसएमएस प्रणाली अद्ययावत करून प्रवाशांना सुखकर प्रवासाची योग्य सेवा, सुविधा द्या खासदार नरेश म्हस्के यांचे

ठाण्यातील २३ जण दुबईत अडकले

ठाणे : इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर परिणाम झाला असून

Udddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना डोंबिवलीत मोठा धक्का! विभाग प्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'धनुष्यबाण'

मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल पाहता, भारतीय जनता

ठाणे आणि विरार बुलेट ट्रेन स्थानक होणार स्मार्ट; एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन

प्रवाशांना अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध ठाणे : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महाराष्ट्रातील ठाणे

पाणीटंचाई विरोधात पीएनटी कॉलनीतील नागरिकांचा कडोंमपा मुख्यालयावर मोर्चा

२५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्वेतील नांदिवली

मीरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापौर सक्रिय

भाईंदर : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या, त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास तसेच