राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.


शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच म्हणून केली होती.ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय होते.त्यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. २००९ ते २०१४ या दरम्यान १० वर्षे त्यांनी राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत राहुरी मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला होता. ते अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे एक महत्त्वाचे आणि प्रभावी नेते होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.





आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे