राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.


शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच म्हणून केली होती.ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय होते.त्यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. २००९ ते २०१४ या दरम्यान १० वर्षे त्यांनी राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत राहुरी मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला होता. ते अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे एक महत्त्वाचे आणि प्रभावी नेते होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.





आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०