राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.


शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सरपंच म्हणून केली होती.ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील सक्रिय होते.त्यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून विजय मिळवला. २००९ ते २०१४ या दरम्यान १० वर्षे त्यांनी राहुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करत राहुरी मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला होता. ते अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे एक महत्त्वाचे आणि प्रभावी नेते होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे होते.





आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे