अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत


अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच


मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने उलटले. शिक्षकांनी निम्मा अभ्यासक्रम संपवून परीक्षेच्या तयारीला सुरुवात झाली. दिवाळीच्या सुट्टीची वेळ आली. तरीही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. दहा फेऱ्या पूर्ण झाल्या. राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तरी अचानक अकरावीची फेरी सुरू झाली आहे. यात आता सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. प्रश्न हा आहे की, इतके दिवस विद्यार्थी मिळत नव्हते, मग आता हे विद्यार्थी होते तरी कुठे? हा सवाल पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.


राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दहा फेऱ्यानंतरही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी जाहीर करण्यात आली. या फेरीत ६ हजार २६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून त्यापैकी ५ हजार ६४१ जणांना १० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजेच वर्ग सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले असतानाही प्रवेशाची प्रक्रिया थांबत नाही असेच दिसून येत आहे. या ना त्या कारणाने शालेय शिक्षण विभागाकडून हे प्रवेशाच्या फेरी सुरूच आहेत.


१५ सप्टेंबरपर्यंत दहा फेरी संपल्या होत्या. तब्बल १५ दिवसांनंतर आणखी एका फेरीचे नियोजन करत प्रवेश सुरू केले आहेत. राज्यातील ९ हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ७१ हजार जागांसाठी राबवलेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत १३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.



Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :