अकरावीच्या प्रवेशासाठी ६ हजार विद्यार्थी प्रतीक्षेत


अजूनही राज्यात ८ लाख ३५ हजार जागा रिक्तच


मुंबई (प्रतिनिधी) :  शाळांचे वर्ग सुरू होऊन तीन महिने उलटले. शिक्षकांनी निम्मा अभ्यासक्रम संपवून परीक्षेच्या तयारीला सुरुवात झाली. दिवाळीच्या सुट्टीची वेळ आली. तरीही अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. दहा फेऱ्या पूर्ण झाल्या. राज्यात लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. तरी अचानक अकरावीची फेरी सुरू झाली आहे. यात आता सहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे. प्रश्न हा आहे की, इतके दिवस विद्यार्थी मिळत नव्हते, मग आता हे विद्यार्थी होते तरी कुठे? हा सवाल पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.


राज्यातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दहा फेऱ्यानंतरही प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक फेरी जाहीर करण्यात आली. या फेरीत ६ हजार २६२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असून त्यापैकी ५ हजार ६४१ जणांना १० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. म्हणजेच वर्ग सुरू होऊन तब्बल तीन महिने उलटले असतानाही प्रवेशाची प्रक्रिया थांबत नाही असेच दिसून येत आहे. या ना त्या कारणाने शालेय शिक्षण विभागाकडून हे प्रवेशाच्या फेरी सुरूच आहेत.


१५ सप्टेंबरपर्यंत दहा फेरी संपल्या होत्या. तब्बल १५ दिवसांनंतर आणखी एका फेरीचे नियोजन करत प्रवेश सुरू केले आहेत. राज्यातील ९ हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांतील २१ लाख ७१ हजार जागांसाठी राबवलेल्या या प्रक्रियेत आतापर्यंत १३ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.



Comments
Add Comment

मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील शीतल तेजवानी पुन्हा चर्चेत! बोपोडी येथे जमीन गैरव्यवहार केल्याप्रकरणी एफआरआय दाखल

मुंबई: ‘बोपोडीमधील कथित भूखंड गैरव्यवहाराशी माझा काहीच संबंध नसताना मला त्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक प्रभारी, •महायुतीतील तीन मंत्र्यांची समन्वय समिती, मित्रपक्षांवर टीका-टिप्पणी न

साडेतीन वर्षातच मेट्रो डब्ब्यांना गंज; एमएमआरडीएच्या गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह

मुंबई : डी. एन. नगर ते दहिसर पूर्व ‘मेट्रो २ अ’ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या ‘मेट्रो ७’ मार्गिकेवर कोट्यवधी

येणाऱ्या पालिका निवडणुकीत महाआघाडीचे तीन तेरा वाजणार : आशिष शेलार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना मुस्लिम महापौर करायचा आहे का ? विशिष्ट धर्माच्या

मुंबईच्या शाळेने न्यायालयाचा आदेश धुडकावला! 'त्या' कुत्र्यांना आश्रयस्थानी पाठवण्यास 'ट्युलिप स्कूल'चा नकार

मुंबई: साकीनाका येथील ट्युलिप इंग्लिश स्कूल या शाळेने अलीकडील सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पाळण्यास नकार देत

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय उद्या, १२ नोव्हेंबर पासून सुनावणी सुरू करणार