केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी प्लॅटफॉर्मला राम राम ठोकत, पूर्णपणे भारतीय असलेल्या 'झोहो मेल' (Zoho Mail) या स्वदेशी ई-मेल सेवेचा स्वीकार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' आणि 'स्वदेशी'च्या आवाहनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.


अमित शहा यांचा हा निर्णय देशांतर्गत (स्वदेशी) तंत्रज्ञानाचा वापर वाढवून 'आत्मनिर्भर भारत' अभियानाला बळ देण्यासाठी आहे. देशामध्येच विकसित झालेल्या उत्पादनांना प्राधान्य देणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.


 


परदेशी सॉफ्टवेअरवरील अवलंबित्व कमी करणे


जोहो (Zoho) ही एक भारतीय कंपनी आहे, जी केवळ ई-मेलच नाही, तर डॉक्युमेंट्स, स्प्रेडशीट्स आणि प्रेझेंटेशन्ससाठी 'झोहो ऑफिस सूट' सारखी उत्पादकता साधने देखील पुरवते. सरकारी कामकाजात विदेशी सॉफ्टवेअरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी हा निर्णय धोरणात्मक मानला जात आहे.


शिक्षण मंत्रालयाने यापूर्वीच आपल्या सर्व अधिकाऱ्यांना अधिकृत कामांसाठी 'झोहो ऑफिस सूट' वापरण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे डिजिटल स्वावलंबनाच्या दिशेने सरकारचा वाढता कल दिसून येतो.


काय म्हणाले अमित शहा?


केंद्रीय गृहमंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर या बदलाची माहिती दिली. त्यांनी लिहिले, "नमस्कार सर्वांना, मी आता झोहो मेलवर स्विच केले आहे. कृपया माझ्या ई-मेल ॲड्रेसमधील बदलाची नोंद घ्यावी. माझा नवीन ई-मेल ॲड्रेस amitshah.bjp@zohomail.in हा आहे. भविष्यातील सर्व पत्रव्यवहारासाठी कृपया याच पत्त्याचा वापर करावा. या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद."


अमित शहा यांच्यापूर्वी केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही 'झोहो मेल'वर स्विच करण्याची घोषणा केली होती. देशाच्या प्रमुख नेत्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाला दिलेला हा पाठिंबा भारतीय टेक उद्योगासाठी आणि 'झोहो' कंपनीच्या विकास पथकासाठी मोठा उत्साहवर्धक आहे.

Comments
Add Comment

हिवाळी अधिवेशनाआधी केंद्र सरकारची सर्वपक्षीय बैठक

मुंबई : हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते