अक्षय कुमारमुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशात बदल होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?


मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की या संस्थेसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पोलिसांच्या बुटांविषयी बोलले. यामुळे राज्यातल्या पोलिसांच्या गणवेशात बदल होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


मुख्यमंत्र्‍यांशी बोलताना मुलाखती दरम्यान अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांचा विषय उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री पण आहेत. पोलीस विभाग थेट त्यांच्या नियंत्रणात आहे म्हणून अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांबाबत मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा उपस्थित केला.


पोलिसांना त्याच्या कामाचा भाग म्हणून अनेकदा धावपळ करावी लागते. कायदा हाती घेणाऱ्यांना पकडण्यासाठी धावावे लागते, पाठलाग करावा लागतो. हे करताना टाचेचे बूट असल्यास धावण्याच्या वेगावर मर्यादा येतात. याउलट क्रीडापटू वापरतात तसे बूट किंवा पळण्यास मदत होईल अशा रचनेचे बूट असले तर पोलिसांना त्यांचे काम प्रभावीरित्या करण्यास मदत होईल, असे अक्षय कुमार म्हणाला. हे ऐकताच मुख्यमंत्री गंभीर झाले. त्यांनी अक्षय कुमार मांडत असलेला मुद्दा व्यवस्थित ऐकून घेतला आणि त्याला लगेच उत्तर दिले.


आतापर्यंत पोलिसांना गणवेश म्हणून जे बूट दिले जात होते त्याच बुटांचा वापर ते संचलनाच्या कार्यक्रमात करत आहेत. यामुळे पोलिसांच्या बुटांचा जास्त विचार होत नव्हता. पण अक्षय कुमारने मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याने पोलिसांच्या बुटांबाबत ज्या दिशेने विचार करायला हवा असे मत मांडले ते महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच पोलिसांना पळण्यास सोपे होईल असे बूट देण्यासाठी नियोजन करू, असे सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.


पोलिसांना उपयुक्त बुटांचे डिझाइन तयार करण्यासाठी आपले सहकार्य मिळाले तर उत्तम होईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला मदत करण्यास सांगितले. यामुळे भविष्यात वेगाने पळता येईल अशा स्वरुपाचे नव्या डिझाइनचे बूट पोलिसांना गणवेशाचा भाग म्हणून दिले जाण्याची शक्यता वाढली आहे.


Comments
Add Comment

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या