अक्षय कुमारमुळे महाराष्ट्रातील पोलिसांच्या गणवेशात बदल होणार ? काय म्हणाले मुख्यमंत्री ?


मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच फिक्की या संस्थेसाठी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री पोलिसांच्या बुटांविषयी बोलले. यामुळे राज्यातल्या पोलिसांच्या गणवेशात बदल होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.


मुख्यमंत्र्‍यांशी बोलताना मुलाखती दरम्यान अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांचा विषय उपस्थित केला. मुख्यमंत्री फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री पण आहेत. पोलीस विभाग थेट त्यांच्या नियंत्रणात आहे म्हणून अक्षय कुमारने पोलिसांच्या बुटांबाबत मुख्यमंत्र्यांसमोर मुद्दा उपस्थित केला.


पोलिसांना त्याच्या कामाचा भाग म्हणून अनेकदा धावपळ करावी लागते. कायदा हाती घेणाऱ्यांना पकडण्यासाठी धावावे लागते, पाठलाग करावा लागतो. हे करताना टाचेचे बूट असल्यास धावण्याच्या वेगावर मर्यादा येतात. याउलट क्रीडापटू वापरतात तसे बूट किंवा पळण्यास मदत होईल अशा रचनेचे बूट असले तर पोलिसांना त्यांचे काम प्रभावीरित्या करण्यास मदत होईल, असे अक्षय कुमार म्हणाला. हे ऐकताच मुख्यमंत्री गंभीर झाले. त्यांनी अक्षय कुमार मांडत असलेला मुद्दा व्यवस्थित ऐकून घेतला आणि त्याला लगेच उत्तर दिले.


आतापर्यंत पोलिसांना गणवेश म्हणून जे बूट दिले जात होते त्याच बुटांचा वापर ते संचलनाच्या कार्यक्रमात करत आहेत. यामुळे पोलिसांच्या बुटांचा जास्त विचार होत नव्हता. पण अक्षय कुमारने मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्याने पोलिसांच्या बुटांबाबत ज्या दिशेने विचार करायला हवा असे मत मांडले ते महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लवकरच पोलिसांना पळण्यास सोपे होईल असे बूट देण्यासाठी नियोजन करू, असे सकारात्मक उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.


पोलिसांना उपयुक्त बुटांचे डिझाइन तयार करण्यासाठी आपले सहकार्य मिळाले तर उत्तम होईल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अक्षय कुमारला मदत करण्यास सांगितले. यामुळे भविष्यात वेगाने पळता येईल अशा स्वरुपाचे नव्या डिझाइनचे बूट पोलिसांना गणवेशाचा भाग म्हणून दिले जाण्याची शक्यता वाढली आहे.


Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०