वसतिगृहातून १२ महिला पळाल्या; ७ सापडल्या

उल्हासनगर शासकीय वसतिगृहातील घटना


उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगरच्या शासकीय महिला सुधारगृहातून तब्बल १२ महिलांनी पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी यातील ७ महिलांना शोधून काढले आहे. पाच महिलांचा अजूनही शोध लागलेला नाही. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिन्यात याच परिसरातील मुलींच्या वसतिगृहातून ८ मुलींनी पळ काढला होता.


उल्हासनगर येथे ठाणे जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणारे महिलांचे आणि मुलींचे वसतिगृह आहे. काही महिन्यांत येथून मुलींचे पळून जाण्याचे प्रकार उघड झाले आहेत. तसेच येथील व्यवस्थेवर अनेकदा वसतिगृहातील महिलांनी आणि मुलींनी आरोपदेखील केले आहे. सप्टेंबरमध्ये सुधारगृहात राहत असलेल्या सहा मुलींनी पळ काढला. याबाबतची माहिती मिळताच जिल्हा महिला बाल विकास विभागाने पोलिसांच्या मदतीने या मुलींची शोध मोहीम राबविली. यातील मुलींना शोधण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आले.


जानेवरीमध्येही सुधारगृहाची सुरक्षा भिंत ओलांडून आणि येथील लोखंडी गज वाकवून तब्बल आठ मुलींनी पळ काढला होता. पोलिसांना मुली सापडल्यानंतर सुधारगृहाच्या व्यवस्थापनावर त्यांनी बोट ठेवत येथील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ठाणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणेअंतर्गत पीटा कायद्यानुसार कारवाई केल्यानंतर या महिलांना उल्हासनगरच्या या शासकीय महिला सुधारगृहात आणून ठेवण्यात आले होते.


Comments
Add Comment

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

IPL 2026 : आयपीएल फायनलसाठी मोहसीन नकवी भारतात येणार ? क्रिकेटविश्वात खळबळ, सत्य काय ?

अहमदाबाद : आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या

MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती.

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Pakistan in WTC : षटकारांच्या संथ गतीचा फटका, ICC च्या कारवाईमुळे पाकिस्तान WTC मध्ये आठव्या स्थानी

मुंबई  : आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट संघावर कडक कारवाई करत मोठा दंड ठोठावला आहे. याचा संघाला वर्ल्ड टेस्ट