दिवाळीसाठी गावाला जाताय, रेल्वे सोडतेय ३० विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त अतिरिक्त विशेष गाड्या धावणार


मुंबई (प्रतिनिधी) : येत्या दिवाळी उत्सवानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ३० अतिरिक्त विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पुणे दानापूर --सुपौल एक्सप्रेस बदललेल्या गाडी क्रमांकांसह धावणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ही गाडी सोमवार दि. ६, १३ व २० ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १० वाजून ४० मिनिटांनी पोहोचेल. ०१००४ साप्ताहिक विशेष गाडी रविवार दि. ५ . १२ व १९ ऑक्टोबर रोजी मडगाव येथून ४ वाजून ३० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे ६.२० वाजता पोहोचेल.


या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेर्डी, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, वीलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत.


पनवेल चिपळूण पनवेल अनारक्षित विशेष ही गाडी दि. ३ ऑक्टो. ते २६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी पनवेल येथून १६.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी २१.५५ वाजता पोहोचेल. ०११६० अनारक्षित विशेष गाडी दि. ३ ऑक्टो. ते २६ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी चिपळूण येथून ११.०५ वाजता सुटेल आणि पनवेल येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाड्या अनारक्षित असतील आणि त्यासाठी तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे बुक करता येतील.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.