'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या


भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल


बीड: सावरगाव येथील दसरा मेळाव्याच्या मंचावर पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे प्रथमच एकत्र आले असताना, उपस्थित समर्थकांनी घातलेल्या गोंधळामुळे पंकजा मुंडे प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले.


भाषणाची सुरुवात करतानाच पंकजा मुंडे यांनी गोंधळ घालणाऱ्यांना थेट इशारा दिला. "माझ्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून लोक येतात. झाडावर, टॉवर बसलेले लोक स्वत: आले आहेत. मी तुम्हाला आणलं का? असा धिंगाणा करणारे लोक माझे असू शकत नाहीत. तुमची भगवान बाबांवर श्रद्धा असेल, तर असा गोंधळ करू नका. तुम्ही स्वत: आला असाल, तर तोंडं बंद करा."



गोंधळ घालणाऱ्यांवर थेट प्रहार


पंकजा मुंडे यांनी गोंधळ घालणाऱ्यांवर आपला राग व्यक्त केला. "दरवर्षी माझ्या दसऱ्या मेळाव्यात लोक येतात, पण मागच्या वर्षीपासून असे हलके वागणारे लोक का येत आहेत?" असा संतप्त सवाल त्यांनी केला.


त्यांनी स्पष्ट केले, "तुम्ही शुद्धीवर नाही. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही माझी माणसं नाहीत. तुम्ही कितीही माझ्या नावाच्या घोषणा दिल्या तरी तुम्ही पवित्र होणार नाही, कारण अशी बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती."



'विरासत में संघर्ष मिला है'


गोंधळामुळे व्यत्यय येत असतानाही पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना शायरीतून व्यक्त केल्या.


"विरासत में संघर्ष मिला है, तो जिद भी मिली है लडने की,


चाहे जो भी हो, दटकर आगे बढने की,


बदलू मै क्यों मै विचारोंकी अटल चोटी हूँ,


मै गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ..."



भगवानगडाचा वारसा हिरावून घेण्याचा प्रयत्न


पंकजा मुंडे यांनी यावेळी भावनिक होत जुन्या संघर्षाला उजाळा दिला. "माझा भगवान गडावरील मेळावा काढून घेतला गेला (त्या जागेवरचा अधिकार हिरावला गेला)." आता हा (सावरगाव येथील) मेळावाही तुम्ही हिरावून घेताय असं वाटतं," असे त्या गोंधळ घालणाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या.


याचदरम्यान, पंकजा मुंडे यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख पाहून वेदना झाल्याचे व्यक्त केले. "मी शब्दात मांडू शकत नाही. मोदी आणि फडणवीस यांच्यावतीने मी शब्द देते की, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि पूर्ण मदत करणार आहोत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


याआधी धनंजय मुंडे बोलतानाही उपस्थितांनी गोंधळ घातला होता. तेव्हा धनंजय मुंडे यांनीही संतापून "तुम्ही बोलू देण्यासाठी आलात की बंद करण्यासाठी?" असा सवाल करत, "मला चांगलं आणि वाईटही समजावता येतं," असा इशारा दिला होता. गोंधळातही दोन्ही मुंडे बंधू-भगिनींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली.


Comments
Add Comment

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध