जिंकण्याची खात्री असलेल्या जागाच लढवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वक्तव्य


मुंबई : ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्याच जागा लढवण्याचा निर्णय महायुती घेणार असून, केवळ संख्येसाठी जागा अडवण्याऐवजी इलेक्टिव्ह मेरिटवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुखांच्या संवाद कार्यक्रमानंतर रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागावाटपाबाबत महायुतीच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. यात ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्या जागा लढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचे इलेक्टिव्ह मेरिट तपासले जाणार, असेही त्यांनी नमूद केले.


शिवसेनेने मुंबईतील शाखाप्रमुखांशी संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. शिंदे यांनी यावेळी शाखाप्रमुखांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा आहे. ते स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. आता सर्व शाखाप्रमुख निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी ते उत्सुक आहेत,’ असे शिंदे म्हणाले.


शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षांत आणि आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. ‘मुंबई पालिकेसाठी विविध विकास प्रकल्प राबवले गेले आहेत. या कामांच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. ही विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. जनता आमच्या कामांवर विश्वास ठेवते आणि याच विश्वासाच्या जोरावर आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवू,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



मुंबईत महायुतीचाच महापौर


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महायुतीचाच महापौर असेल, असा दावा शिंदे यांनी केला. ‘कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं आणि महायुतीचा महापौर निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे,’ असे त्यांनी सांगितलं. यासाठी कार्यकर्ते आणि पक्ष यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Mumbai Metro : मुंबई मेट्रो लाईन ६ प्रकल्पात नियोजनाचा अभाव; MMRDA वर उभारलेले खांब तोडण्याची वेळ

मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो लाईन ६ प्रकल्पात मुंबई महानगर प्रदेश

कर्जत यार्ड आधुनिकीकरणासाठी मध्य रेल्वेचा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर यार्ड पुनर्रचना आणि आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा

‘दसरा मेळाव्याबाबत विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा’

मुंबई : सर्व मंत्र्यांनी दौरे केले. शेतकऱ्यांचा रोष, नाराजी, राग, विरोध पाहायला मिळाला. जेव्हा घरदार उध्वस्त होते.

राज्यातील ७५ हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देणार, रोजगार इच्छुक तरुणांना संधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे होणार

12th Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी...

अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे बारावी परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मुंबई : राज्यात होत असलेली

मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टकडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड