जिंकण्याची खात्री असलेल्या जागाच लढवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत वक्तव्य


मुंबई : ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्याच जागा लढवण्याचा निर्णय महायुती घेणार असून, केवळ संख्येसाठी जागा अडवण्याऐवजी इलेक्टिव्ह मेरिटवर लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकावणे हेच मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुखांच्या संवाद कार्यक्रमानंतर रात्री आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जागावाटपाबाबत महायुतीच्या समन्वयकांची बैठक होणार आहे. यात ज्या जागांवर विजयाची खात्री आहे, त्या जागा लढवण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जागेचे इलेक्टिव्ह मेरिट तपासले जाणार, असेही त्यांनी नमूद केले.


शिवसेनेने मुंबईतील शाखाप्रमुखांशी संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. शिंदे यांनी यावेळी शाखाप्रमुखांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ‘शाखाप्रमुख हा पक्षाचा कणा आहे. ते स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. आता सर्व शाखाप्रमुख निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी ते उत्सुक आहेत,’ असे शिंदे म्हणाले.


शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात अडीच वर्षांत आणि आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. ‘मुंबई पालिकेसाठी विविध विकास प्रकल्प राबवले गेले आहेत. या कामांच्या जोरावरच विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. ही विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. जनता आमच्या कामांवर विश्वास ठेवते आणि याच विश्वासाच्या जोरावर आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीत यश मिळवू,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



मुंबईत महायुतीचाच महापौर


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर महायुतीचाच महापौर असेल, असा दावा शिंदे यांनी केला. ‘कोणाला किती जागा मिळतील हे महत्त्वाचे नाही, तर मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकवणं आणि महायुतीचा महापौर निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे,’ असे त्यांनी सांगितलं. यासाठी कार्यकर्ते आणि पक्ष यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

कबुतरखान्याचा मुद्दा परत तापणार! जैन मुनींनी दिला उपोषणाचा इशारा, आम्ही गिरगावकर संघटनाही आक्रमक

मुंबई: दादर येथील कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील अनेक दिवसांपासून दादर येथील कबुतरखाना

Exclusive News: मतदार यादीमुळे विरोधकांना कशा प्रकारे झाली मदत; भाजप करणार पर्दाफाश!

'दिल्ली अजून दूर, मी २०२९ पर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार' - देवेंद्र फडणवीस मुंबई: महाराष्ट्राचे

बाप रे ! 'लाडकी बहीण' योजनेचा १२,४३१ पुरुषांनीच घेतला गैरफायदा; सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश, कोट्यवधींची लूट!

मुंबई: महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारावे आणि कुटुंबातील त्यांचा निर्णय

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

एअर इंडियाचे अमेरिकेला निघालेले विमान टेक-ऑफनंतर मुंबईत परतले; तांत्रिक बिघाडाची सात दिवसांतील दुसरी घटना

मुंबई: एअर इंडियाच्या मुंबईहून अमेरिकेतील नेवार्क शहराकडे जाणाऱ्या विमानाला (फ्लाइट AI191) टेक-ऑफनंतर तांत्रिक

खासदार रवींद्र वायकर यांच्या इमारतीला आग; 'फायर सिस्टीम'मधील त्रुटींमुळे वायकर संतापले!

मुंबई: सध्या दिवाळीच्या धामधुमीत फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच एक मोठी आणि