चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण दुर्घटना घडली. वीज केंद्रातील बांधकाम सुरू असलेली एक मोठी पोलादी कमान (Arch) कोसळल्याने नऊ कामगारांचा मृत्यू झाला असून, सुमारे १० हून अधिक कामगार गंभीर जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत ९ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व कामगार उत्तर भारतातील स्थलांतरित मजूर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या १० हून अधिक कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.



बचाव कार्य


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले असून, कोसळलेल्या ढिगाऱ्याखालून मृतदेह आणि जखमी कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि महसूल अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेच्या कारणांचा तपास करत आहेत.


सुरक्षेवर प्रश्नचिन्ह


या दुर्घटनेमुळे वीज केंद्राच्या बांधकाम स्थळांवरील सुरक्षा मानकांवर आणि कामगारांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४