पूरग्रस्तांसाठी दोन महिला अधिकारी ठरल्या देवदूत!

पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना दिला आधार!


लातूर : अहमदपूर तालुक्यात सुरु झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी पहाटेपर्यंत अतिवृष्टीचे स्वरूप धारण केले. तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. यामुळे शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले, तर अनेक गावांचा अहमदपूर शहराशी असलेला संपर्क तुटला होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत दोन महिला अधिकाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता, भर पावसात फिल्डवर उतरून जे गौरवशाली कार्य केले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


​ज्यावेळी अनेक नागरिक घरात सुरक्षित ठिकाणी थांबले होते, त्यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर या दोन कर्तव्यदक्ष महिला अधिकारी मदतीसाठी पुढे सरसावल्या.


​शनिवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू असतानाही, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पूरग्रस्त भागांना भेटी दिल्या. त्यांनी केवळ कार्यालयात बसून सूचना दिल्या नाहीत, तर स्वतः भर पावसात, रस्त्यावर उतरून अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना धीर दिला आणि तातडीने मदत व बचाव कार्याला गती दिली.


चिलखा येथील मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या तीन मजुरांना सुखरूप बाहेर निघेपर्यत दोन्ही महीला अधिकारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सोबत भर पावसात उभ्या राहुन बच्याव कार्यावर थेट लक्ष ठेवत होत्या


​पावसाचा जोर, तुटलेले रस्ते आणि वाढलेला पाण्याचा प्रवाह यामुळे परिस्थिती गंभीर असताना, या दोन महिला अधिकाऱ्यांनी दाखवलेली कर्तबगारी, समर्पण आणि धाडस वाखाणण्याजोगे आहे. प्रशासकीय काम आणि जबाबदारी पार पाडताना 'महिला' म्हणून कोणताही वेगळा विचार न करता, त्यांनी चोवीस तास परिस्थितीवर नियंत्रण ठेवले.


​पुराचे पाणी कमी झाल्यानंतर तातडीने नुकसानीचे पंचनामे सुरू करणे, विस्थापित कुटुंबांना सुरक्षित निवारा आणि अन्न-पाण्याची व्यवस्था करणे, तसेच संपर्क तुटलेल्या गावांमध्ये मदत पोहोचवण्याचे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले.


​उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे आणि तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी संकटकाळी केलेल्या या असाधारण कामगिरीबद्दल संपूर्ण तालुका त्यांचे आभार व्यक्त करत आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाचे नेतृत्व कसे असावे, याचा आदर्श वस्तुपाठच या दोन महिला अधिकाऱ्यांनी घालून दिला आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

ताम्हिणी घाटातील सिक्रेट पॉईंटवर खून आरोपी २४ तासात पोलिसांच्या ताब्यात

माणगाव : ताम्हिणी घाटात सणसवाडी बेडगाव हद्दीत सिक्रेट पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी अनोळखी इसमाचा मृतदेह