प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म ८० दिवस राहणार बंद


मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ हा एक ऑक्टोबर २०२५ पासून ८० दिवस वापरता येणार नाही. फलाट १९ डिसेंबरपर्यंत वापरासाठी उपलब्ध नसेल. यामुळे अमरावती आणि नंदिग्राम एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. रेल्वे एक ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे. फलाट क्रमांक १८ वर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या कामासाठी फलाट क्रमांक १८ च्या परिसरात खोदकाम केले जाईल. याच कारणामुळे छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ रेल्वे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. दादर ते सीएसएमटीदरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेगाड्या रद्द राहणार आहेत. रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात आरएलडीए छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे.


सध्या छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाटांवर खांब उभारण्याचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १२-१३ वर सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होईल. यानंतर हा फलाट रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सीएसएमटीतील फलाट क्रमांक १८ वर काम सुरू होणार आहे.


Comments
Add Comment

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख

महापालिकेच्यावतीने मुंबई क्लीन लीग स्पर्धा; स्वच्छता विषयक स्पर्धेच्या नोंदणीचा अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: मुंबई अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०