प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म ८० दिवस राहणार बंद


मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ हा एक ऑक्टोबर २०२५ पासून ८० दिवस वापरता येणार नाही. फलाट १९ डिसेंबरपर्यंत वापरासाठी उपलब्ध नसेल. यामुळे अमरावती आणि नंदिग्राम एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. रेल्वे एक ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे. फलाट क्रमांक १८ वर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या कामासाठी फलाट क्रमांक १८ च्या परिसरात खोदकाम केले जाईल. याच कारणामुळे छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ रेल्वे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. दादर ते सीएसएमटीदरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेगाड्या रद्द राहणार आहेत. रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात आरएलडीए छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे.


सध्या छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाटांवर खांब उभारण्याचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १२-१३ वर सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होईल. यानंतर हा फलाट रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सीएसएमटीतील फलाट क्रमांक १८ वर काम सुरू होणार आहे.


Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत