प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म ८० दिवस राहणार बंद


मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ हा एक ऑक्टोबर २०२५ पासून ८० दिवस वापरता येणार नाही. फलाट १९ डिसेंबरपर्यंत वापरासाठी उपलब्ध नसेल. यामुळे अमरावती आणि नंदिग्राम एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. रेल्वे एक ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे. फलाट क्रमांक १८ वर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या कामासाठी फलाट क्रमांक १८ च्या परिसरात खोदकाम केले जाईल. याच कारणामुळे छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ रेल्वे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. दादर ते सीएसएमटीदरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेगाड्या रद्द राहणार आहेत. रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात आरएलडीए छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे.


सध्या छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाटांवर खांब उभारण्याचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १२-१३ वर सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होईल. यानंतर हा फलाट रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सीएसएमटीतील फलाट क्रमांक १८ वर काम सुरू होणार आहे.


Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल