प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेचा हा प्लॅटफॉर्म ८० दिवस राहणार बंद


मुंबई : प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईत असलेला छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार आहे. पुनर्विकासाच्या कामासाठी फलाट क्रमांक १८ तब्बल ८० दिवस बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.


छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ हा एक ऑक्टोबर २०२५ पासून ८० दिवस वापरता येणार नाही. फलाट १९ डिसेंबरपर्यंत वापरासाठी उपलब्ध नसेल. यामुळे अमरावती आणि नंदिग्राम एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत. रेल्वे एक ऑक्टोबर ते १९ डिसेंबर २०२५ या कालावधीत छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे. फलाट क्रमांक १८ वर प्रवाशांसाठी अनेक सोयीसुविधांची निर्मिती केली जाणार आहे. या कामासाठी फलाट क्रमांक १८ च्या परिसरात खोदकाम केले जाईल. याच कारणामुळे छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ रेल्वे वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. दादर ते सीएसएमटीदरम्यान पुढील सूचना मिळेपर्यंत रेल्वेगाड्या रद्द राहणार आहेत. रेल्वे लँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात आरएलडीए छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाट क्रमांक १८ चा पुनर्विकास करणार आहे.


सध्या छत्रपती महाराज टर्मिनस स्थानकावरील फलाटांवर खांब उभारण्याचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १२-१३ वर सुरू असलेले काम लवकरच पूर्ण होईल. यानंतर हा फलाट रेल्वे वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सीएसएमटीतील फलाट क्रमांक १८ वर काम सुरू होणार आहे.


Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२